भारतीय हवाई दलाचा अनेक वर्षांचा आधारस्तंभ राहिलेले 'MiG-21' हे लढाऊ विमान आज, २६ सप्टेंबर रोजी सेवेतून निवृत्त झाले आहे. भारताचे पहिले सुपरसोनिक लढाऊ विमान असलेल्या 'मिग-२१' ने १९६५, १९७१ आणि कारगिलच्या १९९९ च्या युद्धात पाकिस्तानच्या सैनिकांना अक्षरशः धडकी भरवली होती.
आपल्या कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यातही या 'फ्लाइंग मशीन'ने पाकिस्तानच्या 'एफ-१६' या लढाऊ विमानाचा वेध घेऊन आपला दबदबा सिद्ध केला होता. चंदीगड येथे आयोजित एका विशेष समारंभात मिग-२१ ला अखेरची मानवंदना दिली गेली.
राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत समारंभ!
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ लढाऊ विमानांच्या ताफ्याच्या सेवामुक्ती समारंभात विशेष उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला सीडीएस जनरल अनिल चौहान, सीओएएस जनरल उपेंद्र द्विवेदी आणि सीएनएस ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी हे देखील उपस्थित आहेत.
सेवामुक्ती समारंभापूर्वी विंग कमांडर (निवृत्त) राजीव बत्तीश यांनी मिग-२१ बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. "मिग-२१ चा प्रवास खूप मोठा आणि ऐतिहासिक आहे. या विमानाला निरोप देण्यासाठी इतके लोक जमले आहेत, हेच या विमानाचे महत्त्व सिद्ध करते," असे ते म्हणाले. "भारताच्या संदर्भात बोलायचं झाल्यास, सर्वाधिक वैमानिकांनी उडवलेले लढाऊ विमान म्हणजे मिग-२१ आहे. हे अत्यंत शक्तिशाली विमान होते," असेही ते म्हणाले.
'मिग २१'ची खास वैशिष्ट्ये:
मिग-२१ हे लहान डिझाइनचे पण अत्यंत शक्तिशाली विमान म्हणून ओळखले जात होते, जे जलद हल्ला आणि हवाई युद्धासाठी महत्त्वपूर्ण मानले गेले. मिग-२१चा कमाल वेग सुमारे २,२०० किलोमीटर प्रति तास इतका होता. हे विमान १७,५०० मीटरपर्यंतच्या उंचीवर उड्डाण करू शकत होते. यात हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे बसवली जात होती. अनेक दशके भारताच्या हवाई संरक्षणाची धुरा वाहिलेल्या या 'हिरो' विमानाला आज सन्मानाने निरोप दिला गेला.
Web Summary : The Indian Air Force retired its MiG-21 fighter jet after decades of service. The supersonic aircraft played a crucial role in past wars, including against Pakistan. A decommissioning ceremony was held in Chandigarh with top officials present, marking the end of an era for this powerful aircraft.
Web Summary : भारतीय वायुसेना ने दशकों की सेवा के बाद अपने मिग-21 लड़ाकू विमान को रिटायर कर दिया। इस सुपरसोनिक विमान ने पाकिस्तान के खिलाफ युद्धों सहित अतीत में महत्वपूर्ण भूमिका निभाई। चंडीगढ़ में शीर्ष अधिकारियों की उपस्थिति में एक विदाई समारोह आयोजित किया गया, जो इस शक्तिशाली विमान के लिए एक युग के अंत का प्रतीक है।