शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

काही महिला कायद्याचा दहशतवाद पसरवतायेत; कोलकाता हायकोर्टानं मांडलं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 20:07 IST

लग्नानंतर कधीही महिलेने तिच्या सासरच्यासोबत राहण्याचे ठरवले नाही. ज्यामुळे एक वेगळे घर घेऊन पती-पत्नी राहत होते असंही कोर्टाने म्हटलं

नवी दिल्ली – हुंडाविरोधी कायद्याच्या गैरवापरावरून कोलकाता हायकोर्टाने चिंता व्यक्त केली आहे. काही महिलांनी भारतीय दंड विधान आयपीसी कलम ४९८ ए चा दुरुपयोग करून कायद्याची दहशत पसरवली आहे असं कोर्टाने निरिक्षण नोंदवले. हा एक असा कायदा आहे जो महिलांना त्यांच्या पती आणि सासरच्यांच्या छळापासून संरक्षण देण्यासाठी बनवण्यात आला होता.

पत्नीने लावलेल्या आरोपाविरोधात पती आणि त्याच्या कुटुंबाने हायकोर्टात दाद मागितली होती. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी हायकोर्टाने हे मत मांडले. कोर्टाने म्हटलं की, कलम ४९८ ए हे समाजातील हुंड्याविरोधी प्रथांना आळा घालण्यासाठी लागू करण्यात आले होते. परंतु अनेक प्रकरणात असं पाहायला मिळते की, या कायद्याचा गैरवापर करून कायद्याचा दहशतवाद पसरवला जातोय. कलम ४९८ ए अंतर्गत सुरक्षेची व्याख्या छळ आणि यातना ही केवळ तक्रारदाराच्या उल्लेखाप्रमाणे सिद्ध करता येत नाही.

केवळ महिलेच्या तक्रारीच्या हवाल्याने...  

रेकॉर्डवर उल्लेख केलेले मेडिकल पुरावे आणि साक्षीदार यांच्या साक्षीने व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबाविरोधात कुठलाही गुन्हा सिद्ध होत नाही. न्या. सुभेंद्रु सामंत यांच्या खंडपीठाने महिलेच्या तक्रारीच्या अनुषंगाने कनिष्ठ न्यायालयाकडून सुरु असलेल्या खटल्याच्या कार्यवाहीला रद्द केले. वास्तविक तक्रारदाराकडून पतीविरोधात लावलेले आरोप केवळ तिच्या बोलण्यात आहे. हे कुठलेही दस्तावेज अथवा मेडिकल रिपोर्ट यावरून सिद्ध झाले नाहीत. कायद्याने तक्रारदारांना गुन्ह्याची नोंद करण्यासाठी परवानगी देते परंतु त्यासाठी ठोस पुरावे जोडण्याने ते योग्य ठरेल असं कोर्टाने म्हटलं.

त्याचसोबत पती-पत्नी सुरुवातीपासून कुटुंबासोबत राहत नव्हते. ते एका वेगळ्या घरात राहत होते. तक्रारदाराने याचिकेत लावलेले आरोप तिच्या मनाप्रमाणे आहेत. तक्रारदार महिलेवर हल्ला किंवा तिचा छळ हे तथ्य समोर आले नाही. लग्नानंतर कधीही महिलेने तिच्या सासरच्यासोबत राहण्याचे ठरवले नाही. ज्यामुळे एक वेगळे घर घेऊन पती-पत्नी राहत होते असंही कोर्टाने म्हटलं

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय