शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 08:15 IST

या व्हर्च्युअल बैठकीत २४ पक्षांनी भाग घेतला होता. प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी दिल्ली : संसदेच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनापूर्वी ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्षांनी व्हर्च्युअल बैठक घेत सरकारला घेरण्याच्या रणनीतीवर चर्चा केली. बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते प्रमोद तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले की, भाजप सरकारला संसदेमध्ये आठ वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून जाब मागितला जाणार आहे. 

तिवारी म्हणाले की, या व्हर्च्युअल बैठकीत २४ पक्षांनी भाग घेतला होता. प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठक अतिशय सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. इंडिया आघाडीचे नेते लवकरच एकमेकांना प्रत्यक्ष भेटणार आहेत. यात सरकारच्या धोरणाविरुद्धचा लढा आणखी तीव्र करण्याच्या मुद्द्यावर चर्चा होईल. ऑनलाइन बैठकीत विविध अनेक नेत्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले, परंतु प्रामुख्याने आठ मुद्द्यांवर सर्वांचे एकमत झाले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना-उबाठाचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार, राजद नेते तेजस्वी यादव आणि काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान, ‘आप’ने बैठकीपासून दूर राहिली. संसद व्यवस्थित चालावी, असे इंडिया आघाडीतील सर्व पक्षांना वाटते, परंतु यासाठी सरकारला विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत उपस्थित राहून स्वतः या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. देशात लोकशाही आणि संवैधानिक अधिकार धोक्यात आहेत आणि अशा परिस्थितीत विरोधी पक्षांची भूमिका व जबाबदारी आणखी महत्त्वाची बनते, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. 

परराष्ट्र धोरणाबद्दल विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता सरकारच्या परराष्ट्र धोरणाबद्दल विरोधी पक्षांनी विशेष चिंता व्यक्त केली. यामध्ये पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भारत-पाकिस्तान युद्धबंदीचे दावे, बिहारमधील एसआयआर सराव, मतदानाच्या अधिकारांवरील संकट, सीमांकन, एससी, एसटी आणि महिलांवरील अत्याचार, अहमदाबादमधील विमान अपघात, ‘अघोषित आणीबाणी’, सरकारचे परराष्ट्र धोरण आदी मुद्द्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे मीडिया प्रभारी जयराम रमेश यांनी आधीच पहलगाम दहशतवादी हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थी भाष्य आणि चीन मुद्द्यांवर किमान दोन दिवस चर्चेची मागणी केली जाईल, असे स्पष्ट केले होते.

टॅग्स :Indiaभारतcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस