शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
2
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
3
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
4
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
5
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
6
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
7
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
8
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
9
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
10
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
11
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
12
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
13
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
14
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
15
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
16
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
17
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
18
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
19
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
20
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 10:58 IST

husband-Wife Relationship News: भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हे सात जन्मांचं बंधन मानलं जातं. आजच्या काळात नातेसंबंधांमधील वीण सैल होत चालली असताना काही पती-पत्नी मात्र शेवटपर्यंत एकमेकांची साथ देतात. त्यांना एकमेकांचा विरहही सहन होत नाही. अशीच घटना मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील बीना येथे घडली आहे.

भारतीय संस्कृतीमध्ये विवाह हे सात जन्मांचं बंधन मानलं जातं. आजच्या काळात नातेसंबंधांमधील वीण सैल होत चालली असताना काही पती-पत्नी मात्र शेवटपर्यंत एकमेकांची साथ देतात. त्यांना एकमेकांचा विरहही सहन होत नाही. अशीच घटना मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील बीना येथे घडली आहे. येथील नाराणय रैकवार आणि त्यांची पत्नी शिवकुमारी रैकवार या दाम्पत्याच्याबाबतीत याचाच प्रत्यय आला आहे. या दोघांचंही एकमेकांवर एवढं प्रेम होतं की, पत्नीच्या मृत्यूनंतर तासाभरातच पतीनेही प्राण सोडले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बीना येथील भीमवॉर्डमधील रहिवासी असलेल्या शिवकुमारी रैकवार ह्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने डॉक्टरांनी हात वर केले होते. त्यानंतर त्यांना घरी नेण्यात येत होते. मात्र वाटेतच त्यांचं निधन झालं.

जेव्हा त्यांचे मुलगे त्यांचा मृतदेह घेऊन आले तेव्हा पत्नीचा मृतदेह पाहून नारायण रैकवार यांना धक्का बसला. शोक अनावर होऊन ते एका कोपऱ्यात जाऊन बसले. काही वेळाने ते तिथेच कोसळले. मुलांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांच्या शरीरातून प्राण निघून गेला होता. 

नारायण रैकवार आणि शिवकुमारी हे गेल्या ४८ वर्षांपासून एकमेकांना साथ देत संसार करत होते. त्यामुळे पत्नीचं निर्जिव शरीर पाहताच पती नारायण यांनीही प्राण सोडले. एकाचवेळी आई आणि वडिलांचं छत्र हरपल्याने मुले आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यानंतर या पती पत्नीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशrelationshipरिलेशनशिप