शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

'गांधी घराण्याने पद सोडावं अन् दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी'; काँग्रेसच्या नेत्याचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:40 IST

पाच राज्यातील निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

नवी दिल्ली : पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील दारूण पराभवाची चिकित्सा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अध्यक्ष असतील, यावर एकमत झाले. बैठकीच्या सुरुवातीलाच नेतृत्वाबाबत तक्रार असल्यास पद सोडण्याची तयारी असल्याचे सोनियांनी सूचित केले. परंतु कार्यकारिणीच्या सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. मात्र, पक्ष मजबुतीसाठी नव्याने काम करण्याची गरज असल्याचे सदस्यांनी ठळकपणे अधोरेखित केले.

पाच राज्यातील निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी महत्वाचं विधान केलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळे मला आश्चर्य वाटले नाही. गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी. तुम्हाला जर पराभवाची कारणे माहीत नसतील, तर तुम्ही कल्पनालोकात जगत असल्याचं कपिल सिब्बल यांनी सांगितलं.

निवडणुकीत पराभवानंतरही काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी पराभव स्वीकार केलेला नाही. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये २०२४ साठी रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांनी रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील पराभवावर विचारमंथन केले, परंतु त्यापूर्वी त्यांनी काही तास कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

दरम्यान, पुढील दोन वर्षात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आव्हानांला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा काँग्रेस कार्यकारिणीसह संघटनात्मक फेरबदल करण्याचा बेत आहे. हे फेरबदल एकाचवेळी किंवा टप्प्याटप्प्यात केले जाऊ शकतात.

लोकसभेच्या दोनशे जागांसाठी काँग्रेस आणि भाजपदरम्यान थेट लढत होणार असेल, तर पंजाब, राजस्थान, छत्तीसगढमधील सत्ता राखणे आणि मध्य प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजय मिळविणे, हेच काँग्रेसचे प्राधान्य आहे. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार झारखंड, तेलंगणात निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर रणनितीक आघाडीने भाजपला रोखता येईल. २३ नेत्यांच्या समूहाचाही (जी २३) समावेश केला जाऊ शकतो. या भूपिंदर सिंह हुडा वगळता या समूहातील अन्य जनमाणसात प्रभाव असलेले नेते नसले, तरी ते अनुभवी आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी निष्ठावंत आहेत. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेस