शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

'गांधी घराण्याने पद सोडावं अन् दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी'; काँग्रेसच्या नेत्याचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 13:40 IST

पाच राज्यातील निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी महत्वाचं विधान केलं आहे.

नवी दिल्ली : पाच राज्यांत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतील दारूण पराभवाची चिकित्सा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका होईपर्यंत सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अध्यक्ष असतील, यावर एकमत झाले. बैठकीच्या सुरुवातीलाच नेतृत्वाबाबत तक्रार असल्यास पद सोडण्याची तयारी असल्याचे सोनियांनी सूचित केले. परंतु कार्यकारिणीच्या सदस्यांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले. मात्र, पक्ष मजबुतीसाठी नव्याने काम करण्याची गरज असल्याचे सदस्यांनी ठळकपणे अधोरेखित केले.

पाच राज्यातील निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी महत्वाचं विधान केलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सिब्बल म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवामुळे मला आश्चर्य वाटले नाही. गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी. तुम्हाला जर पराभवाची कारणे माहीत नसतील, तर तुम्ही कल्पनालोकात जगत असल्याचं कपिल सिब्बल यांनी सांगितलं.

निवडणुकीत पराभवानंतरही काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी पराभव स्वीकार केलेला नाही. त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये २०२४ साठी रणनीती बनवण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांनी रविवारी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत उत्तर प्रदेशातील पराभवावर विचारमंथन केले, परंतु त्यापूर्वी त्यांनी काही तास कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

दरम्यान, पुढील दोन वर्षात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आव्हानांला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा काँग्रेस कार्यकारिणीसह संघटनात्मक फेरबदल करण्याचा बेत आहे. हे फेरबदल एकाचवेळी किंवा टप्प्याटप्प्यात केले जाऊ शकतात.

लोकसभेच्या दोनशे जागांसाठी काँग्रेस आणि भाजपदरम्यान थेट लढत होणार असेल, तर पंजाब, राजस्थान, छत्तीसगढमधील सत्ता राखणे आणि मध्य प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, गोवा आणि उत्तराखंडमध्ये विजय मिळविणे, हेच काँग्रेसचे प्राधान्य आहे. याशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार झारखंड, तेलंगणात निवडणूक पूर्व आणि निवडणुकीनंतर रणनितीक आघाडीने भाजपला रोखता येईल. २३ नेत्यांच्या समूहाचाही (जी २३) समावेश केला जाऊ शकतो. या भूपिंदर सिंह हुडा वगळता या समूहातील अन्य जनमाणसात प्रभाव असलेले नेते नसले, तरी ते अनुभवी आणि इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी निष्ठावंत आहेत. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलcongressकाँग्रेस