शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

"असामचं भविष्य असुरक्षित, आम्ही अल्पसंख्याक झालोय", हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केली भीती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 15:40 IST

Himanta Biswa Sarma News: आसाम राज्याचं भविष्य सुरक्षित राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण म्हणजे या राज्यात हिंदू आणि मुस्लिम समाजांच्या लोकसंख्येचं गुणोत्तर झपाट्याने बिघडत आहे. आता सरमा यांनी केलेल्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. स्वातंत्र्य दिनी ध्वजवंदन केल्यानंतर हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, आसाम राज्याचं भविष्य सुरक्षित राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण म्हणजे या राज्यात हिंदू आणि मुस्लिम समाजांच्या लोकसंख्येचं गुणोत्तर झपाट्याने बिघडत आहे. आता सरमा यांनी केलेल्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

सरमा म्हणाले की, आता आसाममधील मुळनिवासी हे बचावात्मक भूमिकेत गेले आहेत.  आसाममधील बारा तेरा जिल्ह्यात हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. असामचं भविष्य आमच्यासाठी सुरक्षित राहिलेलं नाही. संपूर्ण राज्यात हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्येमधील संतुलन हे वेगाने संपुष्टात येत आहे. राज्यातील मुस्लिम लोकसंख्या २०२१ मध्ये वाढून ४१ टक्के झाली आहे. तर हिंदू लोकसंख्या घटून ५७ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. उर्वरित लोकसंख्येमध्ये ख्रिश्चन आणि इतरांचा समावेश आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती त्यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या अधिकृत भाषणांमधून दिली आहे. 

ते पुढे म्हणाले की, हिंदू लोकसंख्या ६०-६५ टक्क्यांवरून घटून ५० टक्क्यांपर्यंत येत आहे, ही चिंतेची बाब आहे. हा काळ संकटाचा आहे. मी लोकसंख्येचं संतुलन प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मी सर्व हिंदू, मुस्लिम आणि इतरांना कुटुंब नियोजना संबंधीच्या नियमांचे पालन करण्याचं आवाहन करतो. तसेच समाजातील प्रत्येक वर्गात होणाऱ्या बहुविवाहाबाबत आपण सतर्क राहिलं पाहिजे, असेही ते म्हणाले. 

हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केलं ही, आम्ही १२-१३ जिल्ह्यांमध्ये अल्पसंख्याक झालो आहोत. जर भक्कम सरकार नसेल तर मुलनिवासींसाठी प्रत्येक पावलावर संकट असेल. मी सूर्याचा प्रकाश नाही. पण मुलनिवासींच्या हितांच्या रक्षणासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मेणबत्तीप्रमाणे उभा राहीन, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :AssamआसामBJPभाजपाHinduहिंदूMuslimमुस्लीमIndiaभारत