शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

गरिबांचा आहार पुन्हा महागणार, तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 09:41 IST

खरीप उत्पादनात घट झाल्याने तांदळाचे भाव वाढण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : खरीप हंगामात भाताची लागवड कमी झाल्याने तांदळाचे उत्पादन तब्बल ६० ते ७० लाख टनांनी कमी राहण्याची भीती आहे. यामुळे तांदळाच्या किमती पुन्हा एकदा वाढणार आहेत. अशा स्थितीत आधीच मंदावलेल्या अर्थव्यवस्थेवर महागाईचा ताण वाढेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. तीन महिन्यांपासून घसरत असलेला किरकोळ महागाईचा दर पुन्हा वाढू लागला असून, अन्नधान्यासह सर्व खाद्यपदार्थांच्या किमती वाढत असल्याने, ऑगस्टमध्ये महागाई ७ टक्क्यांवर पोहोचली आहे.

तज्ज्ञ आणि विश्लेषकांनी आगामी काळात महागाई उच्च पातळीवर राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याच वेळी जून-सप्टेंबरमधील अनियमित पाऊस आणि नैऋत्य मोसमी पावसाने अद्याप परतीचा प्रवास सुरू न केल्याने भातपिकाची चिंता वाढली आहे.२०२१-२२ मध्ये भारताचे तांदूळ उत्पादन १३.०२९ कोटी टन होते, जे एका वर्षापूर्वी १२.४३७ कोटी टन होते. यंदाच्या खरीप हंगामात तांदळाचे उत्पादन ६०-७० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज अन्न मंत्रालयाने व्यक्त केला आहे. 

भारताने चिंता करावी का?n काही तज्ज्ञांच्या मते, तांदूळ उत्पादनातील घट हे चिंतेचे कारण नाही.n भारताकडे आधीच असलेला साठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेची (पीडीएस) मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे.n याशिवाय तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा आणि बिगर बासमतीच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे परिस्थिती हाताळण्यास मदत होणार आहे.

जगभरात वाढल्या तांदळाच्या किमतीn भारताकडून निर्यातबंदी घातल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या किमतीत प्रति टन ३५ डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. २० टक्के निर्यात शुल्क लावल्यामुळे ५९ लाख टन तांदूळ भारताबाहेर जाणार नाही. n यामुळे २०२२-२३ मध्ये देशातून होणारी तांदूळ निर्यात २५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे.

आरबीआय काय म्हणते?रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हटले आहे की, इंधन, तसेच इतर वस्तूंच्या किमतीत सवलत देऊनही अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे खाद्यपदार्थांच्या किमती दबावाखाली आहेत.

सरकार काय म्हणते?खरीप हंगामात पीक पेरणी झालेले क्षेत्र कमी असल्याने, कृषी मालाच्या साठ्याचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्याची गरज अर्थमंत्रालयाच्या अहवालात अधोरेखित करण्यात आली आहे. याच वेळी महागाईच्या मुद्द्यावर आता बेफिकीर राहणे टाळले पाहिजे, असे अहवालात म्हटले आहे.

तांदळामुळे देशांतर्गत महागाईचा लगेच कोणताही धोका नाही. एमएसपी आणि खते आणि इंधनासारख्या इतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे किमतीत वाढ झाली. त्यामुळे महागाईत नक्कीच काही प्रमाणात वाढ होणार आहे.    - रमेश चंद, नीती आयोगाचे सदस्य

पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंबदेश    किंमत    वाढ थायलंड    ४३०    ०२व्हिएतनाम    ४०३    १०पाकिस्तान    ३९०    ३५(प्रति टन डॉलरमध्ये)

सरकारकडे किती साठा शिल्लक    २०२१    २०२२    टक्केतांदूळ    २६८.३२    २४४.६३    -८.८%गहू    ५१७.८३    २४८.२२    -५२.१%    (लाख टनांमध्ये)

 

टॅग्स :businessव्यवसायIndiaभारतGovernmentसरकारReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक