शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अख्खं राज्य सरकारच केंद्राविरोधात मैदानात उतरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 14:22 IST

आम्ही सर्वाधिक महसूल केंद्र सरकारला देतो. त्यामुळे आमच्या हक्काचे आम्हाला द्यावे असं उपमुख्यमंत्री डि.के शिवकुमार यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - Karnatak Government Protest in Delhi ( Marathi News ) राजधानी दिल्लीत जंतर मंतरवर अनेक आंदोलने पाहिली असतील परंतु अख्खं राज्य सरकारच केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे पहिल्यांदा घडले आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर कर्नाटक सरकारने केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याासह मंत्री, आमदारही उपस्थित आहेत. केंद्र सरकारकडून आम्हाला कर परतावा दिला जात नाही त्याचसोबत कुठलीही आर्थिक मदत केली जात नाही असा आरोप कर्नाटक सरकारने केला आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले की, आम्ही १०० रुपये केंद्र सरकारला पाठवतो परंतु त्यातील १२-१२ रुपयेच परत मिळतात. आम्हाला आमचा हक्क हवा. जे धोरण गुजरातसाठी बनवले जाते तेच आम्हालाही लागू करावे. कर्नाटकशिवाय केरळ, तामिळनाडू, तेलंगणानेही केंद्र सरकारच्या निधीवाटपावर भेदभावाचा आरोप केला आहे. कर संकलनात महाराष्ट्र हा एक नंबरला आहे तर कर्नाटकचा दुसरा नंबर लागतो. कर्नाटकचे कर संकलनात ४.३० लाख कोटी योगदान आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. 

तर कन्नड लोकांच्या हितासाठी आम्ही दिल्लीत निर्दशने करत आहोत. आम्हाला आमच्या हक्काचा कर परतावा दिला जावा. त्याचसह दुष्काळात केंद्र सरकारने कुठलीही मदत कर्नाटकला दिली नाही. आम्हाला आमचा अधिकार हवा. आम्हाला केवळ १३ टक्के मिळतात. इतर राज्यांना किती मदत मिळते यावर बोलणार नाही. मात्र जे गुजरातला दिले जाते ते केंद्र सरकारने आम्हालाही द्यावे. कर्नाटक देशातील सर्वात मोठे दुसरे राज्य आहे. आम्ही सर्वाधिक महसूल केंद्र सरकारला देतो. त्यामुळे आमच्या हक्काचे आम्हाला द्यावे असं उपमुख्यमंत्री डि.के शिवकुमार यांनी म्हटलं. 

दरम्यान, आंदोलनाआधी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियात पोस्ट केले. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात आम्ही दिल्लीत जातोय. कर्नाटकला मिळणारा कर परतावा आणि निधी वाटपात होणारा भेदभाव याविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. आमची ही चळवळ भाजपाविरोधात नाही. तर कर्नाटकच्या लोकांसाठी ही चळवळ हाती घेतली आहे. त्यामुळे मी सर्व पक्षातील लोकांना तुम्ही या चळवळीत सहभाग नोंदवावा असं आवाहन मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी केले होते.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणCentral Governmentकेंद्र सरकार