शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अख्खं राज्य सरकारच केंद्राविरोधात मैदानात उतरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 14:22 IST

आम्ही सर्वाधिक महसूल केंद्र सरकारला देतो. त्यामुळे आमच्या हक्काचे आम्हाला द्यावे असं उपमुख्यमंत्री डि.के शिवकुमार यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - Karnatak Government Protest in Delhi ( Marathi News ) राजधानी दिल्लीत जंतर मंतरवर अनेक आंदोलने पाहिली असतील परंतु अख्खं राज्य सरकारच केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे पहिल्यांदा घडले आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर कर्नाटक सरकारने केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली आहेत. त्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याासह मंत्री, आमदारही उपस्थित आहेत. केंद्र सरकारकडून आम्हाला कर परतावा दिला जात नाही त्याचसोबत कुठलीही आर्थिक मदत केली जात नाही असा आरोप कर्नाटक सरकारने केला आहे. 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया म्हणाले की, आम्ही १०० रुपये केंद्र सरकारला पाठवतो परंतु त्यातील १२-१२ रुपयेच परत मिळतात. आम्हाला आमचा हक्क हवा. जे धोरण गुजरातसाठी बनवले जाते तेच आम्हालाही लागू करावे. कर्नाटकशिवाय केरळ, तामिळनाडू, तेलंगणानेही केंद्र सरकारच्या निधीवाटपावर भेदभावाचा आरोप केला आहे. कर संकलनात महाराष्ट्र हा एक नंबरला आहे तर कर्नाटकचा दुसरा नंबर लागतो. कर्नाटकचे कर संकलनात ४.३० लाख कोटी योगदान आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. 

तर कन्नड लोकांच्या हितासाठी आम्ही दिल्लीत निर्दशने करत आहोत. आम्हाला आमच्या हक्काचा कर परतावा दिला जावा. त्याचसह दुष्काळात केंद्र सरकारने कुठलीही मदत कर्नाटकला दिली नाही. आम्हाला आमचा अधिकार हवा. आम्हाला केवळ १३ टक्के मिळतात. इतर राज्यांना किती मदत मिळते यावर बोलणार नाही. मात्र जे गुजरातला दिले जाते ते केंद्र सरकारने आम्हालाही द्यावे. कर्नाटक देशातील सर्वात मोठे दुसरे राज्य आहे. आम्ही सर्वाधिक महसूल केंद्र सरकारला देतो. त्यामुळे आमच्या हक्काचे आम्हाला द्यावे असं उपमुख्यमंत्री डि.के शिवकुमार यांनी म्हटलं. 

दरम्यान, आंदोलनाआधी मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियात पोस्ट केले. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाविरोधात आम्ही दिल्लीत जातोय. कर्नाटकला मिळणारा कर परतावा आणि निधी वाटपात होणारा भेदभाव याविरोधात आम्ही आवाज उठवत आहोत. आमची ही चळवळ भाजपाविरोधात नाही. तर कर्नाटकच्या लोकांसाठी ही चळवळ हाती घेतली आहे. त्यामुळे मी सर्व पक्षातील लोकांना तुम्ही या चळवळीत सहभाग नोंदवावा असं आवाहन मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी केले होते.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणCentral Governmentकेंद्र सरकार