शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

देशाचा एक्स-रे व्हावा; मग कळेल देशात OBC-दलित अन् अल्पसंख्याक..; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:22 IST

अहमदाबादमध्ये काँग्रेस अधिवेशनातून राहुल गांधींनी दलित, मागासवर्गीय, आदिवासी, आरएसएस, अदानी-अंबानीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

Rahul Gandhi AICC : गुजरातमधील अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या काठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पक्षाच्या प्रमुखांसह देशभरातील सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधींनी दलित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, आरक्षण, आरएसएस, अदानी-अंबानी, बांग्लादेश आणि ट्रम्प टॅरिफ मुद्द्यावर भाष्य केले.

जातीय जनगणनेच्या मागणीचा पुनरुच्चारराहुल गांधी म्हणतात, 'आपण देशाचा एक्स-रे करुन पाहिला पाहिजे, जेणेकरुन देश खरोखरच दलित, गरीब, मागासलेल्यांचा आदर करतो का, हे समजेल. तेलंगणामध्ये आम्ही जात जनगणनेचे क्रांतिकारी पाऊल उचलले. आम्ही संसदेत जातीय जनगणनेची मागणी केली होती, पण मोदीजी आणि आरएसएसने स्पष्टपणे नकार दिला. मी फक्त जातीय जनगणनेची मागणी केली, ज्याद्वारे मला जाणून घ्यायचे होते की, या देशात देशात कोणाचा सहभाग किती आहे.' 

तेलंगणामध्ये 90% ओबीसी'तेलंगणातील 90% लोकसंख्या ओबीसी, अत्यंत मागासवर्गीय, दलित, अत्यंत दुर्लक्षित दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींची आहे. जर तुम्ही तेलंगणातील कॉर्पोरेट क्षेत्राकडे पाहिले, मालक, सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाची यादी पाहिली, या 90 टक्के लोकसंख्येपैकी एकही व्यक्ती सापडणार नाही. तेलंगणाच्या कॉर्पोरेट क्षेत्रात या 90 टक्के क्षेत्राचा सहभाग जवळजवळ नाही. मला आनंद आहे की, जातीच्या जनगणनेनंतर तेलंगणातील आमच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षण 42 टक्क्यांपर्यंत वाढवले.'

राहुल पुढे म्हणतात, 'पंतप्रधान मोदी 24 तास मागासवर्गीयांबद्दल बोलतात. पण जेव्हा सहभागाचा प्रश्न येतो, तेव्हा भाजपचे लोक गप्प बसतात. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर 50% आरक्षणाची भिंत तोडू, जात जनगणना करू.' राहुल गांधी यांनी अमेरिकन टॅरिफबाबतही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'ट्रम्प यांनी नवीन शुल्क लादणार असल्याचे सांगितले होते. मोदी सरकारने यावर काहीही केले नाही. संसदेत हे नाट्य दोन दिवस चालले. देशावर गंभीर आर्थिक संकटे येणार आहेत पण नरेंद्र मोदी गप्प आहेत,' अशी टीकाही त्यांनी केली.

आम्ही ब्रिटिशांविरुद्ध अन् आरएसएसविरुद्ध लढलो...'आपण स्वातंत्र्यासाठी फक्त ब्रिटिशांशी लढलो नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्धही लढलो. संघाची विचारसरणी ही स्वातंत्र्यलढ्याची विचारसरणी नाही. रामलीला मैदानात आरएसएसने हे संविधान जाळले होते. या संविधानात लिहिले आहे की आपला ध्वज तिरंगा असेल. आरएसएसने या तिरंग्यालाही सलाम केला नाही. हे लोक लोकशाही संपवू इच्छितात. हे सरकार सर्व पैसे अदानी-अंबानींना देऊ इच्छिते. मी एससी/एसटी उपयोजनेचा मुद्दा उपस्थित केला होता.

आम्ही एक क्रांतिकारी कायदा आणला होता, पण भाजपने हा कायदा रद्द केला. भाजप देशातील सर्व संस्थांवर एक-एक करून हल्ला करत आहे. जिथे जिथे दलित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरीब सामान्य वर्गातील लोकांना स्थान मिळत होते, तिथे भाजपने सर्व ठिकाणांचे दरवाजे बंद केले आहेत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ