शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
4
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
5
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
6
"पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
7
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
8
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
9
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
10
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
11
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
12
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
13
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
14
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
15
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
16
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
17
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
18
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
19
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
20
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जीवाची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

देशाचा एक्स-रे व्हावा; मग कळेल देशात OBC-दलित अन् अल्पसंख्याक..; राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 18:22 IST

अहमदाबादमध्ये काँग्रेस अधिवेशनातून राहुल गांधींनी दलित, मागासवर्गीय, आदिवासी, आरएसएस, अदानी-अंबानीसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

Rahul Gandhi AICC : गुजरातमधील अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या काठावर काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पक्षाच्या प्रमुखांसह देशभरातील सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधींनी दलित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, आरक्षण, आरएसएस, अदानी-अंबानी, बांग्लादेश आणि ट्रम्प टॅरिफ मुद्द्यावर भाष्य केले.

जातीय जनगणनेच्या मागणीचा पुनरुच्चारराहुल गांधी म्हणतात, 'आपण देशाचा एक्स-रे करुन पाहिला पाहिजे, जेणेकरुन देश खरोखरच दलित, गरीब, मागासलेल्यांचा आदर करतो का, हे समजेल. तेलंगणामध्ये आम्ही जात जनगणनेचे क्रांतिकारी पाऊल उचलले. आम्ही संसदेत जातीय जनगणनेची मागणी केली होती, पण मोदीजी आणि आरएसएसने स्पष्टपणे नकार दिला. मी फक्त जातीय जनगणनेची मागणी केली, ज्याद्वारे मला जाणून घ्यायचे होते की, या देशात देशात कोणाचा सहभाग किती आहे.' 

तेलंगणामध्ये 90% ओबीसी'तेलंगणातील 90% लोकसंख्या ओबीसी, अत्यंत मागासवर्गीय, दलित, अत्यंत दुर्लक्षित दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासींची आहे. जर तुम्ही तेलंगणातील कॉर्पोरेट क्षेत्राकडे पाहिले, मालक, सीईओ आणि वरिष्ठ व्यवस्थापनाची यादी पाहिली, या 90 टक्के लोकसंख्येपैकी एकही व्यक्ती सापडणार नाही. तेलंगणाच्या कॉर्पोरेट क्षेत्रात या 90 टक्के क्षेत्राचा सहभाग जवळजवळ नाही. मला आनंद आहे की, जातीच्या जनगणनेनंतर तेलंगणातील आमच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसी आरक्षण 42 टक्क्यांपर्यंत वाढवले.'

राहुल पुढे म्हणतात, 'पंतप्रधान मोदी 24 तास मागासवर्गीयांबद्दल बोलतात. पण जेव्हा सहभागाचा प्रश्न येतो, तेव्हा भाजपचे लोक गप्प बसतात. आम्ही पुन्हा सत्तेत आल्यावर 50% आरक्षणाची भिंत तोडू, जात जनगणना करू.' राहुल गांधी यांनी अमेरिकन टॅरिफबाबतही केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 'ट्रम्प यांनी नवीन शुल्क लादणार असल्याचे सांगितले होते. मोदी सरकारने यावर काहीही केले नाही. संसदेत हे नाट्य दोन दिवस चालले. देशावर गंभीर आर्थिक संकटे येणार आहेत पण नरेंद्र मोदी गप्प आहेत,' अशी टीकाही त्यांनी केली.

आम्ही ब्रिटिशांविरुद्ध अन् आरएसएसविरुद्ध लढलो...'आपण स्वातंत्र्यासाठी फक्त ब्रिटिशांशी लढलो नाही, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्धही लढलो. संघाची विचारसरणी ही स्वातंत्र्यलढ्याची विचारसरणी नाही. रामलीला मैदानात आरएसएसने हे संविधान जाळले होते. या संविधानात लिहिले आहे की आपला ध्वज तिरंगा असेल. आरएसएसने या तिरंग्यालाही सलाम केला नाही. हे लोक लोकशाही संपवू इच्छितात. हे सरकार सर्व पैसे अदानी-अंबानींना देऊ इच्छिते. मी एससी/एसटी उपयोजनेचा मुद्दा उपस्थित केला होता.

आम्ही एक क्रांतिकारी कायदा आणला होता, पण भाजपने हा कायदा रद्द केला. भाजप देशातील सर्व संस्थांवर एक-एक करून हल्ला करत आहे. जिथे जिथे दलित, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक आणि गरीब सामान्य वर्गातील लोकांना स्थान मिळत होते, तिथे भाजपने सर्व ठिकाणांचे दरवाजे बंद केले आहेत,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ