शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

सत्तासंघर्षातील कळीच्या मुद्द्यावर आज घटनापीठ करणार सुनावणी; भविष्यातील राजकारणासाठी दिशादर्शक ठरेल निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 06:54 IST

ठाकरे सरकारविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली; पण दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्यावर ई-मेलद्वारे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली.

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावामुळे त्यांचे निर्णय बाधित होतात काय, हा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कळीचा ठरलेला मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठापुढे गुरुवारी सुनावणीसाठी येणार आहे.

ठाकरे सरकारविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली; पण दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्यावर ई-मेलद्वारे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. त्यामुळे अरुणाचल प्रदेश विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नबाम रेबिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐरणीवर आला होता. 

हा निकाल का महत्त्वाचा?सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. भूषण गवई, न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. सूर्यकांत, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या सात सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणीची औपचारिक रूपरेषा आज ठरण्याची शक्यता आहे. ही सुनावणी दीर्घकाळ चालण्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे गटाला फायदा होणार नसला तरी संभाव्य निकाल भविष्यातील राजकारणासाठी उपयुक्त ठरेल, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केले. 

आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणीशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणांच्या याचिकांवर  शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पीठापुढे एकत्र सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिलेल्या निकालपत्रात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपविले होते. 

सेना पक्ष व चिन्ह सुनावणी लांबणीवरशिवसेना पक्ष आणि चिन्हाविषयी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या प्रकरणी गुरुवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. 

नबाम तुकी प्रकरण नेमके काय?- २०१६ साली अरुणाचल प्रदेशमधील तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे बरखास्त केलेले सरकार पुन्हा बहाल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. - या प्रकरणात १४ आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय रोखण्याचा गुवाहाटी न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला होता. - २०१६ साली अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी तत्कालीन राज्यपालांना १४ जानेवारी २०१६ रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्याची विनंती केली होती. - राज्यपालांनी एक महिना आधीच १६ डिसेंबर २०१५ रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलाविले. त्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला. - मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी विधानसभा भवनालाच कुलूप लावले होते तसेच विधानसभेचे अधिवेशन विनंती केलेल्या वेळेच्या आधीच बोलाविण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला तुकी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अयोग्य ठरविला होता. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे