शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

सत्तासंघर्षातील कळीच्या मुद्द्यावर आज घटनापीठ करणार सुनावणी; भविष्यातील राजकारणासाठी दिशादर्शक ठरेल निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 06:54 IST

ठाकरे सरकारविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली; पण दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्यावर ई-मेलद्वारे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली.

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावामुळे त्यांचे निर्णय बाधित होतात काय, हा महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर कळीचा ठरलेला मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठापुढे गुरुवारी सुनावणीसाठी येणार आहे.

ठाकरे सरकारविरुद्ध बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरविण्याची नोटीस बजावली; पण दोन अपक्ष आमदारांनी झिरवाळ यांच्यावर ई-मेलद्वारे अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली. त्यामुळे अरुणाचल प्रदेश विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नबाम रेबिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ऐरणीवर आला होता. 

हा निकाल का महत्त्वाचा?सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. भूषण गवई, न्या. संजय किशन कौल, न्या. संजीव खन्ना, न्या. सूर्यकांत, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा यांच्या सात सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणीची औपचारिक रूपरेषा आज ठरण्याची शक्यता आहे. ही सुनावणी दीर्घकाळ चालण्याच्या शक्यतेमुळे उद्धव ठाकरे गटाला फायदा होणार नसला तरी संभाव्य निकाल भविष्यातील राजकारणासाठी उपयुक्त ठरेल, असे मत ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केले. 

आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणीशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणांच्या याचिकांवर  शुक्रवारी, १३ ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पीठापुढे एकत्र सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी दिलेल्या निकालपत्रात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपविले होते. 

सेना पक्ष व चिन्ह सुनावणी लांबणीवरशिवसेना पक्ष आणि चिन्हाविषयी निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या प्रकरणी गुरुवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. 

नबाम तुकी प्रकरण नेमके काय?- २०१६ साली अरुणाचल प्रदेशमधील तत्कालीन मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे बरखास्त केलेले सरकार पुन्हा बहाल करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. - या प्रकरणात १४ आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय रोखण्याचा गुवाहाटी न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरविला होता. - २०१६ साली अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी तत्कालीन राज्यपालांना १४ जानेवारी २०१६ रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलाविण्याची विनंती केली होती. - राज्यपालांनी एक महिना आधीच १६ डिसेंबर २०१५ रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलाविले. त्यामुळे घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला. - मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी विधानसभा भवनालाच कुलूप लावले होते तसेच विधानसभेचे अधिवेशन विनंती केलेल्या वेळेच्या आधीच बोलाविण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला तुकी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. राज्यपालांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अयोग्य ठरविला होता. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे