शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

Insurance: कंपनीने काढलाय तुमचा विमा! तुम्हाला ठाऊकंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 09:11 IST

Health Insurance: गंभीर आजार, तसेच अपघात विमा काढण्याबाबत सर्व जण सजग असतात. कोरोना माहामारी उद्भवल्यानंतर आरोग्य विमा किती महत्त्वाचा असतो, हे सगळ्यांना कळून चुकले आहे.

गंभीर आजार, तसेच अपघात विमा काढण्याबाबत सर्व जण सजग असतात. कोरोना माहामारी उद्भवल्यानंतर आरोग्य विमा किती महत्त्वाचा असतो, हे सगळ्यांना कळून चुकले आहे. हल्ली अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेक सोईसुविधांसोबत आरोग्यविमाही काढून देतात, परंतु आजही तब्बल ८३ टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीने आपला आरोग्य विमा काढला आहे, हेच ठाऊक नसते. हेल्थटेक कंपनी ऑनश्योरिटीने देशभर केलेल्या पाहणीत ही गंभीर बाब समोर आली आहे. 

८३% जणांना त्यांच्या कंपनीनेच आरोग्य विमा काढल्याचे ठाऊक नाही!

पाहणीत कुणाचा सहभाग? कंपनीने दिल्ली, लखनऊ, गाझियाबाद, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, तसेच चंडीगड आदी शहरांमध्ये विविध क्षेत्रांतील तब्बल १,१५० कर्मचाऱ्यांची मते जाणून घेतली. 

हे झाले उघड...६०% लोकांना हेच माहीत नव्हते की, कंपनीने त्यांच्यासाठी नेमका कोणत्या कंपनीकडून विमा काढला आहे. १० पैकी ९ जणांकडे कंपनीने काढलेला आरोग्यविमा होता, परंतु यातील २ जणांना त्याची रक्कम ठाऊक नव्हती. १० पैकी केवळ एकानेच आरोग्यविम्यासाठी दावा दाखल केला आहे. ८३ टक्के जणांना आरोग्य विम्यामध्ये वैद्यकीय सुविधा दिल्या जातात, याची माहिती नाही. ७१% जणांना आरोग्यविमा पॉलिसीच्या लाभधारकांमध्ये आई-वडिलांनाही समावेश आहे, याची कल्पना नव्हती. 

लाखोंच्या बिलांमुळे खिसा रिकामा ८४% जणांनी डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच आरोग्य तपासण्या करून घेतल्या. त्या वेळीच केल्या असत्या, तर गंभीर आजार होण्याची जोखीम वाढली नसती. 

१६% जणांनी आरोग्य विम्याची नीट माहिती न घेता, उपचारांवर प्रचंड पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे त्यांना आता आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. 

५ टक्के कंपन्याच देताच सर्वंकष विमा गेल्या काही दिवसांत देशात आरोग्य विम्याविषयी जागृती वाढली आहे. याबाबत माहिती घेण्यास लोक उत्सुक असतात. आजही देशातील केवळ ५ टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वंकष विमा काढतात. यात आरोग्य विमा, अपघात किंवा अपंगत्व विमा, टर्म लाइफ इन्शुरन्स आदींचा समावेश.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत