शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

Insurance: कंपनीने काढलाय तुमचा विमा! तुम्हाला ठाऊकंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 09:11 IST

Health Insurance: गंभीर आजार, तसेच अपघात विमा काढण्याबाबत सर्व जण सजग असतात. कोरोना माहामारी उद्भवल्यानंतर आरोग्य विमा किती महत्त्वाचा असतो, हे सगळ्यांना कळून चुकले आहे.

गंभीर आजार, तसेच अपघात विमा काढण्याबाबत सर्व जण सजग असतात. कोरोना माहामारी उद्भवल्यानंतर आरोग्य विमा किती महत्त्वाचा असतो, हे सगळ्यांना कळून चुकले आहे. हल्ली अनेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना अनेक सोईसुविधांसोबत आरोग्यविमाही काढून देतात, परंतु आजही तब्बल ८३ टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीने आपला आरोग्य विमा काढला आहे, हेच ठाऊक नसते. हेल्थटेक कंपनी ऑनश्योरिटीने देशभर केलेल्या पाहणीत ही गंभीर बाब समोर आली आहे. 

८३% जणांना त्यांच्या कंपनीनेच आरोग्य विमा काढल्याचे ठाऊक नाही!

पाहणीत कुणाचा सहभाग? कंपनीने दिल्ली, लखनऊ, गाझियाबाद, मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, तसेच चंडीगड आदी शहरांमध्ये विविध क्षेत्रांतील तब्बल १,१५० कर्मचाऱ्यांची मते जाणून घेतली. 

हे झाले उघड...६०% लोकांना हेच माहीत नव्हते की, कंपनीने त्यांच्यासाठी नेमका कोणत्या कंपनीकडून विमा काढला आहे. १० पैकी ९ जणांकडे कंपनीने काढलेला आरोग्यविमा होता, परंतु यातील २ जणांना त्याची रक्कम ठाऊक नव्हती. १० पैकी केवळ एकानेच आरोग्यविम्यासाठी दावा दाखल केला आहे. ८३ टक्के जणांना आरोग्य विम्यामध्ये वैद्यकीय सुविधा दिल्या जातात, याची माहिती नाही. ७१% जणांना आरोग्यविमा पॉलिसीच्या लाभधारकांमध्ये आई-वडिलांनाही समावेश आहे, याची कल्पना नव्हती. 

लाखोंच्या बिलांमुळे खिसा रिकामा ८४% जणांनी डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच आरोग्य तपासण्या करून घेतल्या. त्या वेळीच केल्या असत्या, तर गंभीर आजार होण्याची जोखीम वाढली नसती. 

१६% जणांनी आरोग्य विम्याची नीट माहिती न घेता, उपचारांवर प्रचंड पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे त्यांना आता आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. 

५ टक्के कंपन्याच देताच सर्वंकष विमा गेल्या काही दिवसांत देशात आरोग्य विम्याविषयी जागृती वाढली आहे. याबाबत माहिती घेण्यास लोक उत्सुक असतात. आजही देशातील केवळ ५ टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना सर्वंकष विमा काढतात. यात आरोग्य विमा, अपघात किंवा अपंगत्व विमा, टर्म लाइफ इन्शुरन्स आदींचा समावेश.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत