शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 21:58 IST

Aravalli Range News: पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अरवली पर्वताच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने आज अखेर महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. सरकारने अरवली पर्वतरांगांमध्ये नव्या खाणकामासाठी परवाने देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.  

पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या अरवली पर्वताच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने आज अखेर महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. सरकारने अरवली पर्वतरांगांमध्ये नव्या खाणकामासाठी परवाने देण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.  आता अरवली पर्वतरांगांच्या कुठल्याही भागात खाणकामासाठी नवी परवानगी मिळणार नाही, असे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारांना स्पष्टपणे सांगितले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय बेकायदेशीर खाणकाम आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या माफियांच्या मुळावर घालण्यात आलेला मोठा घाव आहे, असे मानले जात आहे. 

पर्यावरण आणि सातत्याने घटत चाललेल्या पाण्याच्या पातळीबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही, असे केंद्र सरकारने हा आदेश देताना स्पष्टपणे सांगितले आहे. अरवली पर्वताला एक निरंतर भौगौलिक पर्वतरांग म्हणून वाचवणे हा आज घेण्यात आलेल्या निर्णयामागचा मोठा उद्देश आहे. या पर्वतरांगेची बेकायदेशीर आणि अमर्याद खाणकामामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्यामुळे दिल्ली एनसीआरपासून गुजरातपर्यंत पसरलेली ही पर्वतरांग तुटू नये, या हेतूने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आज लागू करण्यात आलेले निर्बंध संपूर्ण अरवली पर्वतरांगेच्या क्षेत्रात समान पद्धतीने लागू होतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पर्वतांमध्ये खोदकाम करून नव्या खाणी तयार करण्याची परवानगी मिळणार नाही. सरकारने सध्या सुरू असलेल्या खाणींना त्वरित बंद करण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र तिथे राज्य सरकारांकडून पर्यावरण विषयक नियमांचं कठोरपणे पालन करून घेतलं जाईल, असेही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

आता या मुद्द्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. काँग्रेसने सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सरकार अरवलीची परिभाषा बदलून लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी केला आहे. एकीकडे सरकार खाणकामावर बंदी घालत आहे. मात्र दुसरीकडे सरकारचं धोरण स्पष्ट नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.   

English
हिंदी सारांश
Web Title : Government bans new mining in Aravalli range after protests.

Web Summary : The government has banned new mining licenses in the Aravalli range to protect the ecologically sensitive area. This decision aims to curb illegal mining and preserve the Aravalli hills from further damage, addressing environmental concerns and water level depletion. Existing mines will face stricter environmental regulations.
टॅग्स :environmentपर्यावरणCentral Governmentकेंद्र सरकार