शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं ! तुमच्या मुलांच्या दफ्तराचं वजन निश्चित, सरकारचं नवं धोरण जाहीर

By महेश गलांडे | Updated: December 9, 2020 13:56 IST

सरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे.

ठळक मुद्देसरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे.

नवी दिल्ली - शाळेतील विद्यार्थ्यांच्या दफ्तराच्या वजनावरुन नेहमीच वादविवाद आणि चर्चा घडून आल्या आहेत. विशेष म्हणजे सरकार दरबारीही हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला होता. मात्र, आता केंद्र सरकारने या प्रश्नावर कायमचं उत्तर शोधलंय. सरकारने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅग पॉलिसी जारी केली आहे. त्यानुसार, शाळेतील मुलांच्या दफ्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

सरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे. विशेष म्हणजे प्री-प्रायमरी वर्गात शिकणाऱ्यांना बॅग फ्री म्हणजे दफ्तराविना शाळा असं धोरण आखण्यात आलं आहे. केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक वर्षापासून या धोरणाच्या अंमलबजावणीचे आदेश सर्वच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशातील शाळ व महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या बॅगेचं वजन चेक करण्यासाठी शाळांमध्ये वजनकाटा ठेवण्यात येणार आहे. 

पुस्तक प्रकाशकांना पुस्तकाच्या पाठिमागे त्याचे वजनही छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकूण 3 पाठ्यपुस्तके असणार आहेत, ज्याचे वजन 1078 ग्रॅम असेल. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण 6 पुस्तके असणार आहेत. ज्याचे वजन 4182 ग्रॅम एवढे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या बॅगचे वजन निश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक समितीची नेमणूक केली होती. एका दिर्घकालीन सर्वेक्षणानंतर या समितीने स्कूल बॅगचे वजन निश्चित केलं आहे. दरम्यान, अनेकदा देशातील विविध न्यायालयांनीही विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगच्या वजनासंदर्भात मत नोंदवले होते. 

कशाचं वजन किती

स्कूल बॅगमध्ये पुस्तकांचे वजन 500 ग्रॅम ते 3500 ग्रॅम एवढे असणार आहे, तर वह्यांचे वजन 200 ते 2.5 किलो ग्रॅम एवढे असेल. त्यासोबतच, जेवणाच्या डब्ब्याचे आणि पाण्याचे बाटलीचे वजन 200 ग्रॅम ते 1 किलो ग्रॅम एवढेच असणार आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्केच वजन त्यांच्याकडील दफ्तराचे असणार आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय