शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ठरलं ! तुमच्या मुलांच्या दफ्तराचं वजन निश्चित, सरकारचं नवं धोरण जाहीर

By महेश गलांडे | Updated: December 9, 2020 13:56 IST

सरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे.

ठळक मुद्देसरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे.

नवी दिल्ली - शाळेतील विद्यार्थ्यांच्या दफ्तराच्या वजनावरुन नेहमीच वादविवाद आणि चर्चा घडून आल्या आहेत. विशेष म्हणजे सरकार दरबारीही हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला होता. मात्र, आता केंद्र सरकारने या प्रश्नावर कायमचं उत्तर शोधलंय. सरकारने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅग पॉलिसी जारी केली आहे. त्यानुसार, शाळेतील मुलांच्या दफ्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

सरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे. विशेष म्हणजे प्री-प्रायमरी वर्गात शिकणाऱ्यांना बॅग फ्री म्हणजे दफ्तराविना शाळा असं धोरण आखण्यात आलं आहे. केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक वर्षापासून या धोरणाच्या अंमलबजावणीचे आदेश सर्वच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशातील शाळ व महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या बॅगेचं वजन चेक करण्यासाठी शाळांमध्ये वजनकाटा ठेवण्यात येणार आहे. 

पुस्तक प्रकाशकांना पुस्तकाच्या पाठिमागे त्याचे वजनही छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकूण 3 पाठ्यपुस्तके असणार आहेत, ज्याचे वजन 1078 ग्रॅम असेल. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण 6 पुस्तके असणार आहेत. ज्याचे वजन 4182 ग्रॅम एवढे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या बॅगचे वजन निश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक समितीची नेमणूक केली होती. एका दिर्घकालीन सर्वेक्षणानंतर या समितीने स्कूल बॅगचे वजन निश्चित केलं आहे. दरम्यान, अनेकदा देशातील विविध न्यायालयांनीही विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगच्या वजनासंदर्भात मत नोंदवले होते. 

कशाचं वजन किती

स्कूल बॅगमध्ये पुस्तकांचे वजन 500 ग्रॅम ते 3500 ग्रॅम एवढे असणार आहे, तर वह्यांचे वजन 200 ते 2.5 किलो ग्रॅम एवढे असेल. त्यासोबतच, जेवणाच्या डब्ब्याचे आणि पाण्याचे बाटलीचे वजन 200 ग्रॅम ते 1 किलो ग्रॅम एवढेच असणार आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्केच वजन त्यांच्याकडील दफ्तराचे असणार आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय