शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"ती नोटीस भाजी कापायचा नव्हे, तर गंज लागलेला चाकू होता"; जगदीप धनखड यांचे विरोधकांना खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:32 IST

विरोधकांनी दिलेल्या अविश्वास ठरावाच्या नोटीसवर उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी पहिल्यांदाच भाष्य केले. 

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास ठरावाची नोटीस दिली होती. या नोटीसवर जगदीप धनखड यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी विरोधकांवर निशाणा साधला. बायपास सर्जरीसाठी कधीही भाजी कापायचा चाकू वापरायचा नाही, असा अशा शब्दात त्यांनी विरोधकांना सुनावले. 

महिला पत्रकारांशी बोलताना उपराष्ट्रपती धनखड यांनी या अविश्वास प्रस्ताव नोटीस भूमिका मांडली. धनखड यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या विधानाचा उल्लेख करत उत्तर दिले. 

जगदीप धनखड काय बोलले?

उपराष्ट्रपती धनखड म्हणाले, "उपराष्ट्रपतीच्या विरोधात नोटीस बघा... तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. चंद्रशेखरजींनी, एकदा म्हटलं होतं की, बायपास सर्जरी करण्यासाठी कधीही भाजी कापायचा चाकू वापरायचा नाही. ती नोटीस भाजी कापण्याचा चाकूही नव्हता.  तो तर गंज लागलेला चाकू होता. अतिघाई होती. मी जेव्हा ते वाचले, तेव्हा मला धक्काच बसला."

याच मुद्द्यावर पुढे बोलताना जगदीप धनखड म्हणाले, "बरं झालं तुम्ही कोणी ते वाचलं नाही. तुम्ही जर ते वाचलं असतं, तर तुम्हाला अनेक दिवस झोपच आली नसती."

"जर अभिव्यक्ती स्वातंत्र  मर्यादित आहे. तडजोड झाली आहे वा जबरदस्ती केली जात असेल, तर ही लोकशाही मूल्यातील उणीव आहे आणि हे लोकशाहीच्या विकासाच्या विरोधात आहे. लोकशाहीच्या यशासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या म्हणजे अभिव्यक्ती आणि संवाद", असे मत उपराष्ट्रपती धनखड यांनी मांडले. 

पक्षपातीपणा करत असल्याचा विरोधकांनी केला होता आरोप

संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, विरोधकांनी उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला होता. याच मुद्द्यावरून विरोधकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव नोटीस दिली होती. १० डिसेंबर २०२४ रोजी ही नोटीस देण्यात आली होती. 

यावर विरोधी बाकावरील ६० खासदारांच्या सह्या होत्या. राज्यसभेचे सचिव पीसी मोदी यांच्याकडे ही नोटीस देण्यात आली होती. धनखड यांचे नावे चुकीचे लिहिण्यात आले आहे आणि १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होत नसल्याच्या कारणावरून ही नोटीस फेटाळून लावण्यात आली होती. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाjagdeep dhankharजगदीप धनखडcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे