शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता परदेशात जाऊन थरूर यांना गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही- सुब्रमण्यम स्वामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 13:31 IST

सुनंदा पुष्कर प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. परंतु न्यायालयानं त्यांना देशाबाहेर जाण्यापासून घातलेल्या बंदीवर भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे.

नवी दिल्ली- सुनंदा पुष्कर प्रकरणात दिल्लीतल्या पटियाळा हाऊस कोर्टानं शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. परंतु न्यायालयानं त्यांना देशाबाहेर जाण्यापासून घातलेल्या बंदीवर भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. शशी थरूर तिहार जेलमध्ये नाहीत, ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत बसू शकतात. खरं तर तेसुद्धा "बेलवाले"च आहेत. परंतु आता शशी थरूर यांना परदेशात जाऊन वेगवेगळ्या गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही, असं म्हणत सुब्रमण्यम स्वामींनी शशी थरूर यांच्यावर व्यक्तिगत हल्लाबोल केला आहे.सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात  न्यायालयानं काँग्रेस नेते शशी थरूर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. थरूर यांना 1 लाख रुपयांच्या बेल बाँडवर हा जामीन देण्यात आला आहे. परंतु शशी थरूर न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेरही जाऊ शकत नसल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश अरविंद कुमार यांनी दोन्ही बाजूंकडचा युक्तिवाद ऐकला आणि निर्णय राखून ठेवला होता. अखेर त्यावर आज सुनावणी झाली. थरूर यांच्याकडून वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, शशी थरूर एक खासदार आहेत आणि या प्रकरणात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळायलाच हवा. थरूर यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाली आहे. एसआयटीनंही चौकशी पूर्ण केलेली आहे. न्यायालयानं 5 जूनला थरूर यांना समन्स बजावून सात जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. शशी थरूर यांच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्यानं त्यांच्याविरोधात कारवाई करता येऊ शकते, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीShashi Tharoorशशी थरूरSunanda Pushkarसुनंदा पुष्करcongressकाँग्रेसCourtन्यायालयBJPभाजपा