शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

“संसदेत आम्हाला मराठा आरक्षण मुद्द्यावर बोलू दिले नाही”; प्रियांका चतुर्वेदी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 14:30 IST

MP Priyanka Chaturvedi News: महाराष्ट्रातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्वलंत मुद्दे संसदेत मांडू दिले जात नाहीत, असा आरोप प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे.

MP Priyanka Chaturvedi News: मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस तापताना पाहायला मिळत आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यावरून राजकीय दावे-प्रतिदावे सुरू असताना, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला संसदेत बोलू दिले नाही, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केला आहे. 

राज्यसभेत एखादा मुद्दा मांडायचा असेल तर त्याआधी बरीच प्रक्रिया पार करावी लागते. ही सर्व प्रक्रिया मी पार केली होती. सर्व नियम आणि कायदे पाळले होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी यावर चर्चा झाली पाहिजे, अशी आमची इच्छा होती. सर्व कायदे पाळून हा मुद्दा बॅलेटमध्ये लिस्ट झाला होता. या लिस्टमध्ये माझे नाव होते. मी १२ क्रमांकावर होते आणि रजनी पाटील १० क्रमांकावर होत्या. दोघांचे मुद्दे सारखेच होते. जेव्हा नावे घेतली तेव्हा आधी रजनी पाटील यांचे नाव वगळले मग माझे वगळले गेले, असा दावा प्रियांका चतुर्वेदी यांनी केला. त्या मीडियाशी बोलत होते. 

हा राज्यस्तरीय विषय असल्याचे सांगून बोलण्याची संधी दिली नाही

मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी शुन्य प्रहारासाठी नोटीस दिली होती. त्याकरता एक बॅलेट असते, त्यामध्ये विषय निवडला जातो. मग त्याची यादी तयार करून ते संसदेत राज्यसभेत पाठवले जाते. या यादीत माझे आणि खासदार रजनी पाटील यांचे नाव होते. आम्ही एकाच मुद्द्यावर बोलणार होतो. पण आम्हाला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हा राज्यस्तरीय विषय असल्याचे सांगून आम्हाला बोलण्याची संधी दिली नाही, असे प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. तसेच आम्हाला बोलण्यास मज्जाव करण्यात आला. महाराष्ट्रातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दे संसदेत मांडले दिले जात नाहीत, याची खंत असल्याचे प्रियांका चतुर्वेदी यांनी सांगितले.

ही एक नवी प्रथा तयार होतेय की...

मराठा आरक्षणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असून हे आंदोलन उग्र झाले, असे सांगण्याचा प्रयत्न केला. राज्यातील मराठा तरुण आत्महत्या करत आहेत, त्यांच्यावर लाठीचार्ज होत आहे. मंत्रिमंडळातील मंत्रीच मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात हस्तक्षेप गरजेचा आहे, असे मत मांडत, हा अध्यक्षांचा आदेश आहे. ही एक नवी प्रथा तयार होतेय की बॅलेट झाल्यानतंरही अध्यक्ष त्यावर निर्णय घेऊ शकतात की कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे किंवा नाही, अशी टीका प्रियांका चतुर्वेद यांनी केली. 

 

टॅग्स :ParliamentसंसदShiv SenaशिवसेनाRajya Sabhaराज्यसभा