शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

टेरर फंडिंगवर लगाम; भारतात 'No money for terror' परिषदेचे आयोजन, पाकिस्तान नसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 19:07 IST

टेरर फंडिंग रोखण्यासाठी उद्यापासून भारतात 'नो मनी फॉर टेरर' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी दिल्ली:दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी भारतात 'नो मनी फॉर टेरर'(No money for terror) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी ही परिषद भारतात आयोजित केली जाईल. एनआयए (NIA)ने ही परिषद आयोजित केली आहे. 

का आयोजित केली जाते?एनआयएचे डीजी दिनकर गुप्ता सांगतात की, ही परिषद काउंटर टेरर फायनान्सिंगवर आधारित आहे. पहिली परिषद फ्रान्समध्ये झाली होती. दुसरी परिषद 3 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झाली. त्यानंतर कोविडमुळे परिषद होऊ शकली नाही. दहशतवाद्यांना मिळणारा पैसा रोखण्यासाठीच या परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेत भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

परिषदेत 72 देश सहभागी होणार आहेतएनआयएचे डीजी दिनकर गुप्ता सांगतात की, या परिषदेत 72 देश येणार आहेत. प्रत्येक देशाच्या प्रतिनिधींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. 'नार्को दहशतवाद' हाही या परिषदेचा महत्त्वाचा मुद्दा असेल. विशेष म्हणजे, या परिषदेत पाकिस्तान-अफगाणिस्तान सहभागी होणार नाही. डीजी एनआयएच्या म्हणण्यानुसार, त्या देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल, ज्यांचे लोक भारतात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत आहेत. 

सचिव संजय वर्मा यांच्या मते, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत-रशियाचे सहकार्य सुरूच आहे. रशियाचेही FATF मध्ये सहकार्य आहे. ही संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सपेक्षा मोठी आहे. त्यामुळे त्याची व्याप्तीही खूप मोठी असेल. जागतिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी नो मनी फॉर टेरर आणि FATF यांना आगामी काळात एकत्र काम करावे लागणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी क्राउड फंडिंग करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याला प्रतिबंध करण्यावर या परिषदेत चर्चा होणार आहे.

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndiaभारतNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCentral Governmentकेंद्र सरकार