शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

CBI आणि ED प्रमुखांचा कार्यकाळ 2 वर्षांवरुन 5 वर्षांपर्यंत वाढला, केंद्र सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 16:29 IST

सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा अध्यादेशच सरकारने आणला आहे.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या(ED) प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रमुखांचा कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्याचा अध्यादेश सरकारने आणला आहे. सध्या या केंद्रीय संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन्ही अध्यादेशांवर स्वाक्षरी केली आहे. या अध्यादेशानुसार सर्वोच्च संस्थांच्या प्रमुखांचा दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.

न्यायमूर्ती एलएन राव यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक एस के मिश्रा यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीसंदर्भातील एका प्रकरणात निर्णय दिला, ज्यामध्ये न्यायालयाने म्हटले की, केवळ अपवादात्मक परिस्थितीतच मुदतवाढ दिली जावी. कलम(अ) अंतर्गत समितीच्या शिफारशीनुसार आणि काही विशिष्ट कारणांसाठी कार्यकाळ एका वर्षापर्यंत वाढवता येतो. पण, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना कोणत्याही सेवेत मुदतवाढ देता येत नाही. अंमलबजावणी संचालनालयाचे प्रमुख म्हणून पुढील आठवड्यात 17 नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहेत.

विरोधी पक्ष सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांवर गैरवापर होत असल्याचा आरोप करत असताना सरकारने हे अध्यादेश आणले आहेत. सीबीआय, ईडी आणि इतर तपास यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. मात्र, एजन्सींच्या कामात कोणताही हस्तक्षेप नसून ते त्यांचे काम कायदा व नियमानुसार करत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारCBIगुन्हा अन्वेषण विभागEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय