शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Padma Awards 2022: “ते आझाद राहू इच्छितात, कुणाचे गुलाम नाही”; पद्म पुरस्कारावरुन काँग्रेसमध्येच महाभारत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 09:35 IST

Padma Awards 2022: गुलाम नबी आझाद यांना जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारानंतर काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांवरून (Padma Awards 2022) एकीकडे विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत असताना, दुसरीकडे मात्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यावरून पक्षातच मतभेद असल्याचे उघडकीस आले आहे. पद्म पुरस्कारावरून काँग्रेसमध्येच महाभारत सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी ट्विट करत, ते आझाद राहू इच्छितात, गुलाम नाही, असा टोला लगावला आहे. 

विविध राज्यातील अनेक दिग्गजांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. यावरून काही काँग्रेस नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, काही नेत्यांनी यावरून केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. यानंतर गुलाम नबी आझाद यांनी ट्विटर प्रोफाइल बदलल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र, खुद्द गुलाम नबी आझाद यांनी यावर स्पष्टीकरण देत, संभ्रम निर्माण करण्यासाठी काही लोकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. माझ्या ट्विटर प्रोफाइलमध्ये काहीही काढले किंवा जोडलेले नाही. ते पूर्वीप्रमाणेच आहे, असे म्हटले आहे. 

ते आझाद राहू इच्छितात, कुणाचे गुलाम नाही

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी एका ट्विटर युझरच्या ट्विटला रिप्लाय देताना, योग्य गोष्टी कराव्यात. ते आझाद राहू इच्छितात, कुणाचे गुलाम नाही, असे ट्विट करत टोला लगावला आहे. या ट्विटर युझरने पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्म पुरस्कार नाकारल्याबाबत ट्विट केले होते. दुसरीकडे जी-२३ मधील प्रमुख नेते मानले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी गुलाम नबी आझाद यांना पद्म पुरस्कार दिल्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गुलाम नबी आझाद यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल खूप खूप अभिनंदन. विडंबना अशी आहे की, जेव्हा राष्ट्राने सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान ओळखले तेव्हा कॉंग्रेसला त्यांच्या सेवांची आवश्यकता नाही, असे ट्विट कपिल सिब्बल यांनी केले आहे. 

दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पद्म पुरस्कारावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली आहे. हल्ली उठसूट कोणालाही पद्म पुरस्कार दिले जातात. त्यामुळे पुरस्कार नाकारले जातात, हे चित्र बरोबर नाही. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिवंतपणी तुम्ही त्यांची किंमत करत नाही. बालाजी तांबे यांना गेल्या सात वर्षांमध्ये पुरस्कार का देण्यात आला नाही? या व्यक्ती हयात असताना त्यांना पुरस्कार का देण्यात आले नाहीत. पण मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी, असे संजय राऊत म्हणाले.   

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार