शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 12:00 IST

आसाममध्ये होणाऱ्या लग्नासाठी मुंबईतून नवरदेवासह ३४ जणांचे वऱ्हाड मुंबईतून गीतांजली एक्स्प्रेसने कोलकात्याला निघाले.

कोलकाता : लग्नाचे वऱ्हाड मुंबईहून गुवाहाटीला निघाले. पण, रेल्वे झाली लेट. आता लग्नाची घटिका हुकते की काय, या भीतीने चिंताक्रांत झालेल्या वराच्या मदतीला रेल्वे विभाग धावून आला. कधी नव्हे, असे पाऊल रेल्वेने उचलले. 

हावडा येथून गुवाहाटीला जाणारी एक्स्प्रेस रेल्वे अधिकाऱ्यांनी काही मिनिटे थांबवून ठेवली. मुंबईतून निघालेली गाडी हावडा येथे पोहोचताच रेल्वेने संपूर्ण वरातीला दुसऱ्या गाडीत बसविण्यासाठी मदत केली आणि अखेर वऱ्हाड गुवाहाटीकडे रवाना झाले.

आसाममध्ये होणाऱ्या लग्नासाठी मुंबईतून नवरदेवासह ३४ जणांचे वऱ्हाड मुंबईतून गीतांजली एक्स्प्रेसने कोलकात्याला निघाले. तेथून गुवाहाटीला जाण्यासाठी सरायघाट एक्स्प्रेसमध्ये त्यांचे आरक्षण होते. हावडा येथे दुपारी १:०० वाजता पोहोचणारी गीतांजली एक्स्प्रेस काही तास लेट झाली. 

दोन्ही गाड्यांच्या वेळांमध्ये तीन तासांचे अंतर होते. तरीही गाडी लेट झाल्यामुळे वरातींपैकी एक चंद्रशेखर वाघ यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आणि रेल्वेला मदत मागितली. या पोस्टनंतर रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांनी हावडा येथे डीआरएम यांना आवश्यक पावले उचलण्यासाठी सूचना केली. त्यानंतर रेल्वेने चक्क सरायघाट एक्स्प्रेस काही मिनिटे थांबवून ठेवली. ही गाडी दुपारी चार वाजता हावडा येथून रवाना होते. मात्र, गीतांजली एक्स्प्रेस चार वाजून ८ मिनिटांनी हावडा येथे पोहोचली. 

गीतांजली एक्स्प्रेस हावडा येथे पोहोचल्यानंतर संपूर्ण वरातींना नव्या स्थानकातून जुन्या स्थानकावर नेले आणि सरायघाट एक्स्प्रेसमध्ये बसविले. त्यानंतरच गाडी रवाना झाली आणि वाघ कुटुंबीय व नवरदेवाला हायसे वाटले.

वरातीला नेण्यासाठी सज्ज होत्या गाड्या

- हावडा रेल्वे स्थानकावर वाघ यांच्या डब्याजवळ रेल्वेने बॅटरीवर धावणाऱ्या गाड्या सज्ज ठेवल्या होत्या. वरातीच्या सामानासह सर्वांना अतिशय तत्परतेने सरायघाट एक्स्प्रेस उभी असलेल्या प्लॅटफॉर्मवर नेले. यासाठी दोन्ही ट्रेनच्या प्रवाशांनी सहकार्य केले. नवरदेव त्याच्या लग्नासाठी पोहोचेल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेmarriageलग्नMumbaiमुंबई