शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर तणाव, गावकऱ्यांचा मोठा विरोध; CM खट्टर ४ तास घरात बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 13:04 IST

महेंद्रगड गावच्या सीमारेषेवर शुक्रवारी जनसंवाद मोहिमेचा सांगता कार्यक्रम होता.

चंडीगढ - हरयाणाचेमुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना ग्रामीण भागातील जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या घोषणेनंतर गावकऱ्यांनी ते उतरलेल्या घरालाच घेराव घातला. यावेळी, अनेकांनी ग्रामस्थांना समाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी आपल्या रोष व्यक्त करत सर्वांनाच परतवून लागले. त्यामुळे, संबंधित परसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते, पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी जमा झाला होता. महेंद्रगड येथील एका जनसंवाद कार्यक्रमानंतर ही घटना घडली.

महेंद्रगड गावच्या सीमारेषेवर शुक्रवारी जनसंवाद मोहिमेचा सांगता कार्यक्रम होता. यावेळी, तेथे उपस्थित ग्रामस्थांनी गावाला उप-तहसिलचा दर्जा देण्याची मागणी केली. त्यामुळे, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद घेत, या गावाला उप-तहसिलचा दर्जा देण्याची घोषणाच केली. कार्यक्रमानंतर जवळील गाव दोंगडा येथे मुक्कामी होते. येथील ग्रामस्थांना आशा होती की, राज्याचे मुख्यमंत्री गावात आले आहेत, मग काहीतरी चांगलं पदरात पडेल. मात्र, गावच्या काही लोकांनी मागणी केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गावाला उप-तहसिलचा दर्जा देण्याची घोषणा केल्याचं गावकऱ्यांना कळताच त्यांचा संताप अनावर झाला. 

गावकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा बहिष्कार केला, याउलट मुख्यमंत्री जेथे उतरले आहेत, त्या घराला घेराव घालून आपला विरोध  दर्शवला. यावेळी, अटेलीचे स्थानिक आमदार सीताराम आणि माजी शिक्षणमंत्र्यांनीही ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावकऱ्यांनी आमदारांनाही फटकारले, तसेच त्यांचाही विरोध केला. त्यानंतर, मुख्यमंत्री खट्टर यांनी काही ग्रामस्थांना बोलावून घेत त्यांच्याशी चर्चा केली. तसेच, मला स्थानिक स्थितीबद्दल माहिती नव्हती. यापुढील अटेली दौऱ्यात योग्य गावाचे सर्वेक्षण करुनच उप-तहसिल बनविण्याचा निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री खट्टर यांनी ग्रामस्थांना दिले. 

दरम्यान, ग्रामस्थांनी घेराव घातल्यामुळे मुख्यमंत्र्यांना तब्बल ४ तास घरातच बंद राहावे लागले. यावेळी, मोठा पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा जवान घटनास्थली पोहोचले होते. तर, सुरक्षेच्या मुद्द्यावरुन मोठे पोलीस अधिकारीही गावात आले होते. 

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीHaryanaहरयाणाPoliceपोलिस