शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

टेलिकॉम कंपन्यांना दोन वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवावे लागणार कॉल रेकॉर्ड्स; सरकारनं जारी केला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 17:45 IST

Telecom Companies Call Recording : परिपत्रकानुसार, परवानाधारक कंपन्यांना कॉल डेटा रेकॉर्ड, आयपी रेकॉर्ड आणि सर्व व्यावसायिक रेकॉर्ड किमान दोन वर्षांसाठी संग्रहित करावे लागतील.

सरकारने परदेशातून केलेले नॉर्मल कॉल्ससह (International Calls) इंटरनेट कॉल्स, सॅटेलाइट फोन कॉल्स (Satellite Phone Calls), कॉन्फरन्स कॉल्स (Conference Call) आणि मेसेजेस किमान दोन वर्षांसाठी सुरक्षित ठेवणं बंधनकारक केलं आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात दूरसंचार सेवा प्रदात्यांना आंतरराष्ट्रीय कॉल आणि मेसेजेस सुरक्षित ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

डिसेंबरमध्ये युनिफाइड लायसन्समध्ये केलेल्या दुरुस्तीनंतर दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे. यामध्ये दोन वर्षांसाठी कॉल डेटा रेकॉर्डशिवाय इंटरनेट तपशील ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी ही तरतूद केवळ एका वर्षासाठी लागू होती. युनिफाइड परवानाधारक कंपन्यांमध्ये भारती एअरटेल (Bharti Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-idea), बीएसएनएल (BSNL) या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या आपल्या ग्राहकांना सॅटेलाइट फोन सेवा वगळता सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा प्रदान करतात.

सुरक्षाकारणासाठी निर्णयविभागाने शुक्रवारी जारी केलेल्या या परिपत्रकानुसार, परवानाधारक कंपन्यांना कॉल डेटा रेकॉर्ड, आयपी रेकॉर्ड आणि सर्व व्यावसायिक रेकॉर्ड किमान दोन वर्षांसाठी संग्रहित करावे लागतील, जेणेकरून सरकार सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची पडताळणी करू शकेल. जर सरकारकडून विशिष्ट निर्देश दिले नाहीत, तर दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपन्या तो रेकॉर्ड डिलीट करू शकतात. युनिफाइड लायसन्सशी संबंधित तरतुदींमधील बदल टाटा टेलिकम्युनिकेशन्स (Tata Communications), सिस्को वेबेक्स (Cisco Webex), एटी अँड टी (AT&T) अशा ज्यांनी हे परवाने खरेदी केले आहेत,अशा ग्लोबल नेटवर्क्सनदेखील लागू होतील.

टॅग्स :GovernmentसरकारVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाReliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेल