शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:00 IST

Chandrapur News: महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तहसीलअंतर्गत १४ वादग्रस्त गावे 'एक जमीन, दोन सरकार' या विचित्र परिस्थितीत अडकली आहेत. १०० टक्के मराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राचा महसूल विभाग आणि तेलंगणाचा वन विभाग या दोन्हींचा ताबा आहे.

- दीपक साबने जिवती (चंद्रपूर) - महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तहसीलअंतर्गत १४ वादग्रस्त गावे 'एक जमीन, दोन सरकार' या विचित्र परिस्थितीत अडकली आहेत. १०० टक्केमराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राचा महसूल विभाग आणि तेलंगणाचा वन विभाग या दोन्हींचा ताबा आहे. महाराष्ट्राच्या महसूल विभागाची सुमारे १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महाराष्ट्र सरकारने याबाबत पाऊल उचलले नाही.

तेलंगणाने नकाशा बदललासध्या वादग्रस्त गावातील जमिनीवरील वनांचे संरक्षण तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्याच्या केरामेरी मंडल येथील वन विभाग करीत आहे. वर्ष २०१७-१८ पासून महाराष्ट्रातील हजारो हेक्टर महसूल जमीन आणि जंगलाचे क्षेत्र तेलंगणा सरकारने आपल्या ताब्यात घेतले. तेलंगणाच्या नकाशातही ही गावे समाविष्ट केली आहेत.

यासंदर्भात मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाने अद्याप गांभीर्याने घेतले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी व तेलंगणा सरकारच्या ताब्यात असलेली जमीन परत घ्यावी. शेतकऱ्यांच्या ताब्यातील जमिनीचा सर्व्हे करून कायमस्वरूपी पट्टे द्यावे. - रामदास रणवीर, सामाजिक कार्यकर्ता, मुकदमगुडा, ता. जिवती

तीन दशके उलटली तरी...वर्ष १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या घटनेला तीन दशके उलटून गेल्यानंतरही पूर्वीचा आंध्र प्रदेश व सध्याचा तेलंगणा राज्य त्या निर्णयाची अंमलबजावणी टाळत आहेत.त्याहून चिंताजनक बाब म्हणजे, महाराष्ट्र शासनानेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. हा प्रश्न केवळ सीमावादाचा नाही; तर राज्याचा सन्मान, शेतकऱ्यांचे हक्क व संविधानिक निर्णयाच्या अंमलबजावणीचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Telangana claims Maharashtra villages, 15,000 acres despite court order.

Web Summary : Telangana controls 14 Maharashtra villages, including 15,000 acres, despite a Supreme Court ruling favoring Maharashtra. The state government's inaction raises concerns about land rights and constitutional implementation.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणा