शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
5
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
6
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
7
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
8
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
10
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
11
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
12
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
13
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
14
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
15
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
16
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
17
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
18
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
19
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
20
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये

महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:00 IST

Chandrapur News: महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तहसीलअंतर्गत १४ वादग्रस्त गावे 'एक जमीन, दोन सरकार' या विचित्र परिस्थितीत अडकली आहेत. १०० टक्के मराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राचा महसूल विभाग आणि तेलंगणाचा वन विभाग या दोन्हींचा ताबा आहे.

- दीपक साबने जिवती (चंद्रपूर) - महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तहसीलअंतर्गत १४ वादग्रस्त गावे 'एक जमीन, दोन सरकार' या विचित्र परिस्थितीत अडकली आहेत. १०० टक्केमराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राचा महसूल विभाग आणि तेलंगणाचा वन विभाग या दोन्हींचा ताबा आहे. महाराष्ट्राच्या महसूल विभागाची सुमारे १५ हजार एकर जमीन तेलंगणाच्या ताब्यात आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महाराष्ट्र सरकारने याबाबत पाऊल उचलले नाही.

तेलंगणाने नकाशा बदललासध्या वादग्रस्त गावातील जमिनीवरील वनांचे संरक्षण तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्याच्या केरामेरी मंडल येथील वन विभाग करीत आहे. वर्ष २०१७-१८ पासून महाराष्ट्रातील हजारो हेक्टर महसूल जमीन आणि जंगलाचे क्षेत्र तेलंगणा सरकारने आपल्या ताब्यात घेतले. तेलंगणाच्या नकाशातही ही गावे समाविष्ट केली आहेत.

यासंदर्भात मी वारंवार पाठपुरावा करीत आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाने अद्याप गांभीर्याने घेतले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी व तेलंगणा सरकारच्या ताब्यात असलेली जमीन परत घ्यावी. शेतकऱ्यांच्या ताब्यातील जमिनीचा सर्व्हे करून कायमस्वरूपी पट्टे द्यावे. - रामदास रणवीर, सामाजिक कार्यकर्ता, मुकदमगुडा, ता. जिवती

तीन दशके उलटली तरी...वर्ष १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ही १४ गावे महाराष्ट्र राज्याचीच असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या घटनेला तीन दशके उलटून गेल्यानंतरही पूर्वीचा आंध्र प्रदेश व सध्याचा तेलंगणा राज्य त्या निर्णयाची अंमलबजावणी टाळत आहेत.त्याहून चिंताजनक बाब म्हणजे, महाराष्ट्र शासनानेसुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. हा प्रश्न केवळ सीमावादाचा नाही; तर राज्याचा सन्मान, शेतकऱ्यांचे हक्क व संविधानिक निर्णयाच्या अंमलबजावणीचा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Telangana claims Maharashtra villages, 15,000 acres despite court order.

Web Summary : Telangana controls 14 Maharashtra villages, including 15,000 acres, despite a Supreme Court ruling favoring Maharashtra. The state government's inaction raises concerns about land rights and constitutional implementation.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रTelanganaतेलंगणा