शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

"अगोदरच माहिती होतं, तरीही..."; बाहेर आलेल्या कामगारांनी सांगितली बोगद्याच्या आतली परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:49 IST

श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याच्या बाहेर आलेल्या कामगारांनी सांगितली आतली परिस्थिती.

Telangana Tunnel Collapse:तेलंगणातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याच्या दुर्घटनेनंतर अजूनही बचावकार्य सुरू आहे. बचाव पथक आतमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तेलंगणाचे मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांनी श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्यात दोन दिवसांपूर्वी बांधकामाधीन विभाग अर्धवट कोसळल्यानंतर अडकलेल्या आठ लोकांच्या वाचण्याची शक्यता आता खूपच कमी आहे. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अशातच बोगद्याच्या बांधकामाशी संबंधित एका वेल्डरने या घटनेबाबत अनेक खुलासे केले आहेत. बोगद्यात पाणी गळती झाल्याची माहिती कामगारांनी आधीच दिली होती, असे वेल्डरने सांगितले.

तेलंगणाच्या श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याच्या अपघाताबाबत बचाव कार्य अद्याप चालू आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ व्यतिरिक्त अनेक यंत्रणा बचाव कार्यात गुंतल्या आहेत. मात्र अद्याप कोणतेही यश मिळालेले नाही. ३० तासांहून अधिक काळ बोगद्यात अडकलेल्या आठ जणांना बाहेर काढण्याच्या बचाव मोहिमेला रविवारीही यश आले नाही. या घटनेबाबत वेल्डरने धक्कादायक माहिती दिली आहे. कामासाठी आत जावं लागल्याचे वेल्डरने म्हटलं आहे.

शनिवारी २२ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता बोगद्यात गेलेल्या ५० जणांमध्ये संजय साह यांचाही समावेश होता. बोगद्याच्या सुमारे १३.५ किलोमीटर आत छताचा काही भाग कोसळला. यानंतर सर्व कामगार सुखरूप बाहेर पळत सुटले. मात्र बोगद्यातून बाहेर आल्यानंतर आठ जण बाहेर पडू शकले नाहीत हे इतरांच्या लक्षात आले आणि त्यांनी याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर आठ कामगारांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. "हे धोकादायक काम आहे हे आमच्याप्रमाणेच कामगारांनाही माहीत होते. मात्र या कामातून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आपण अनेकदा पाणी गळतीच्या छोट्या घटनांबद्दल बोलतो. पण मजबुरी आहे, काम करावे लागेल," असं वेल्डर संजय साह यांनी म्हटलं.

"रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी बोगद्यातून पाणी गळती होत असल्याची माहिती दिली होती. असे अनेकवेळा घडले आहे. असे असूनही मी सावधपणे आत गेलो. आम्ही बोगद्यात १३ किलोमीटरहून अधिक चालत गेले ज्यासाठी सुमारे एक तास लागला. आम्ही तिथे पोहोचल्यानंतर १५-२० मिनिटांतच मातीचे तुकडे पडू लागले. आत जिथे घटना घडली मी फक्त २० मीटर अंतरावर होतो. शिफ्ट इनचार्जने आम्हाला तेथून पुढे जाण्यास सांगितले आणि अलार्म वाजला. आम्ही धावलो आणि काही मिनिटांतच मोठा आवाज झाला आणि बोगद्याचा काही भाग कोसळला. आम्ही बाहेर आलो तेव्हा आठ जण बाहेर पडू शकले नसल्याचे कळले," असे संजय साह यांनी सांगितले.

टॅग्स :TelanganaतेलंगणाAccidentअपघात