शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:28 IST

Telangana Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्या धोरणाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, नेहमी अदानी-अंबानींवरून आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसवर मोदींनी निशाणा साधला आहे.

या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्या धोरणाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, नेहमी अदानी-अंबानींवरून आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसर मोदींनी निशाणा साधला आहे. निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर अचानक अदानी-अंबानींचं नाव घेणं कसं काय बंद केलंत? त्यांच्याकडून किती माल उचललात? असा सवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन काँग्रेसला विचारला.

तेलंगाणामधील करीमनगर येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मागच्या पाच वर्षांमध्ये सकाळी उठल्यापासून काँग्रेसचे राजकुमार एक जपमाळ ओढायला सुरुवात करायचे हे तुम्ही पाहिलंच असेल. जेव्हापासून त्यांचं राफेल प्रकरण जमिनीवर आलं. तेव्हापासून त्यांनी एक नव्या माळेचा जप सुरू केला. पाच वर्षांपासून ते एकाच माळेचा जप करत होते. पाच उद्योगपती, पाच उद्योगपती. मग हळुहळू अंबानी- अदानी, अंबानी-अदानी म्हणायला लागले. मात्र जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्यात तेव्हापासून यांनी अंबानी-अदानीवरून शिव्या देणं बंद केलं.

आता काँग्रेसच्या युवराजांनी या निवडणुकीत अंबानी आणि अदानींकडून किती माल उचलला, हे जाहीर करावं. काळ्या पैशांच्या गोण्या भरून रुपये आणले आहेत. की टेम्पोमध्ये भरून नोटा कांग्रेससाठी पोहोचल्या आहेत. नेमका काय सौदा झाला आहे ज्यामुळे तुम्ही रातोरात अंबानी आणि अदानींना शिव्या देणं बंद केलंय. पाच वर्षांपर्यंत शिव्या दिल्या आणि रातोरात बंद केल्या.  नक्कीच डाळीमध्ये काहीतरी काळं आहे. काही तरी चोरीचा माल टेंम्पोमध्ये भरून तुम्हाला मिळालाय. याचं उत्तर द्यावं लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिला.

या सभेमधून मोदींनी बीआरएसलाही टीकेचं लक्ष्य केलं. मोदी म्हणाले की, तेलंगाणाच्या स्थापनेवेळी येथील लोकांनी बीआरएसवर विश्वास ठेवला होता. मात्र बीआरएसने जनतेच्या स्वप्नांचा भंग केला आङे. काँग्रेसचाही असाच इतिहास राहिलेला आहे. देशाला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर काँग्रेसनेही हेच केलं.  देश बुडाला तर बुडाला, यांच्या कुटुंबाला काही फरक पडत नाही.  फॅमिली फर्स्ट धोरणामुळे काँग्रेसने माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा अपमान केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला काँग्रेसच्या कार्यालयातही प्रवेश दिला गेला नाही. अखेर भाजपाने पी. व्ही. नरसिंह राव यांना भारत रत्न देऊन सन्मानित केले, असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी लगावला. 

टॅग्स :telangana lok sabha election 2024तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीMukesh Ambaniमुकेश अंबानीGautam Adaniगौतम अदानीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४