शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 13:28 IST

Telangana Lok Sabha Election 2024: या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्या धोरणाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, नेहमी अदानी-अंबानींवरून आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसवर मोदींनी निशाणा साधला आहे.

या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उद्योगपतींना धार्जिण्या असलेल्या धोरणाला विरोधकांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, नेहमी अदानी-अंबानींवरून आपल्याला लक्ष्य करणाऱ्या काँग्रेसर मोदींनी निशाणा साधला आहे. निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर अचानक अदानी-अंबानींचं नाव घेणं कसं काय बंद केलंत? त्यांच्याकडून किती माल उचललात? असा सवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन काँग्रेसला विचारला.

तेलंगाणामधील करीमनगर येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मागच्या पाच वर्षांमध्ये सकाळी उठल्यापासून काँग्रेसचे राजकुमार एक जपमाळ ओढायला सुरुवात करायचे हे तुम्ही पाहिलंच असेल. जेव्हापासून त्यांचं राफेल प्रकरण जमिनीवर आलं. तेव्हापासून त्यांनी एक नव्या माळेचा जप सुरू केला. पाच वर्षांपासून ते एकाच माळेचा जप करत होते. पाच उद्योगपती, पाच उद्योगपती. मग हळुहळू अंबानी- अदानी, अंबानी-अदानी म्हणायला लागले. मात्र जेव्हापासून निवडणुका जाहीर झाल्यात तेव्हापासून यांनी अंबानी-अदानीवरून शिव्या देणं बंद केलं.

आता काँग्रेसच्या युवराजांनी या निवडणुकीत अंबानी आणि अदानींकडून किती माल उचलला, हे जाहीर करावं. काळ्या पैशांच्या गोण्या भरून रुपये आणले आहेत. की टेम्पोमध्ये भरून नोटा कांग्रेससाठी पोहोचल्या आहेत. नेमका काय सौदा झाला आहे ज्यामुळे तुम्ही रातोरात अंबानी आणि अदानींना शिव्या देणं बंद केलंय. पाच वर्षांपर्यंत शिव्या दिल्या आणि रातोरात बंद केल्या.  नक्कीच डाळीमध्ये काहीतरी काळं आहे. काही तरी चोरीचा माल टेंम्पोमध्ये भरून तुम्हाला मिळालाय. याचं उत्तर द्यावं लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला दिला.

या सभेमधून मोदींनी बीआरएसलाही टीकेचं लक्ष्य केलं. मोदी म्हणाले की, तेलंगाणाच्या स्थापनेवेळी येथील लोकांनी बीआरएसवर विश्वास ठेवला होता. मात्र बीआरएसने जनतेच्या स्वप्नांचा भंग केला आङे. काँग्रेसचाही असाच इतिहास राहिलेला आहे. देशाला स्वातंत्र्या मिळाल्यानंतर काँग्रेसनेही हेच केलं.  देश बुडाला तर बुडाला, यांच्या कुटुंबाला काही फरक पडत नाही.  फॅमिली फर्स्ट धोरणामुळे काँग्रेसने माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांचा अपमान केला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला काँग्रेसच्या कार्यालयातही प्रवेश दिला गेला नाही. अखेर भाजपाने पी. व्ही. नरसिंह राव यांना भारत रत्न देऊन सन्मानित केले, असा टोलाही नरेंद्र मोदी यांनी लगावला. 

टॅग्स :telangana lok sabha election 2024तेलंगाना लोकसभा निवडणूक निकाल २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीMukesh Ambaniमुकेश अंबानीGautam Adaniगौतम अदानीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४