शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

"पाकिस्तानची सीमेवर घुसून बॉम्बस्फोट करण्याची सवय होती पण...", अमित शहांची काँग्रेसवर सडकून टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 21:06 IST

Telangana Election 2023 : तेलंगणात निवडणुकीच्या तोंडावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

Amit Shah Telangana Visit : तेलंगणात निवडणुकीच्या तोंडावर बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तेलंगणातील सिकंदराबाद येथील इम्पीरियल गार्डन येथे झालेल्या संवादात्मक बैठकीत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत देशाची अंतर्गत सुरक्षा अत्यंत बिकट होती. देशात रोज कुठे ना कुठे पाकिस्तानातून दहशतवादी हल्ला होत होता आणि आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान गप्प बसले होते. मात्र मोदींच्या राजवटीत देशाची अंतर्गत सुरक्षा चांगली आहे.

तसेच आजच्या घडीला पाकिस्तान आपल्या देशावर हल्ला करण्याचा विचारही करू शकत नाही, असा दावा त्यांनी केला. "काँग्रेस सरकारच्या काळात भारताच्या सीमेत घुसून स्फोट घडवण्याची पाकिस्तानची सवय होती. त्यांनी उरी आणि पुलवामामध्ये कट रचले. पण, पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या रूपात चोख प्रत्युत्तर देण्यात आले", अशा शब्दांत शहा यांनी काँग्रेसचा समाचार घेतला.

२०१४ मध्ये जनतेते देशातील अस्थिरता संपवलीअमित शहा यांनी आणखी सांगितले की, आज जगभर भारताचा डंका आहे. मोदी सरकारच्या काळात आपल्या देशाचा जगभर आदर केला जात आहे. काँग्रेसच्या काळात आपल्या देशाचे परराष्ट्र धोरण अस्पष्ट होते, पण आज ते स्पष्ट आहे. २०१४ मध्ये देशातील जनतेने मोठा निर्णय घेऊन अस्थिरतेचे वातावरण संपवले. जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत दिले. पक्षाची सत्ता येऊन नऊ वर्षे  झाली असली तरी आज आमचे विरोधक देखील पंतप्रधान मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप करू शकत नाहीत. मोदींच्या कार्याचे कौतुक करताना शहा म्हणाले, "नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि ९ वर्षात देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर पोहोचली. लवकरच भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. याबाबत कोणालाच शंका नाही."

टॅग्स :TelanganaतेलंगणाAmit Shahअमित शाहBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस