शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 08:58 IST

Revanth Reddy And Narendra Modi : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचा सामना करण्यामध्ये त्यांच्याकडे धाडस, रणनीती आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचा सामना करण्यामध्ये त्यांच्याकडे धाडस, रणनीती आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं. हैदराबादमध्ये जय हिंद यात्रेपूर्वी एका जाहीर सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री रेवंत यांनी टीकास्त्र सोडलं. "देश आपले शहीद जवान आणि नागरिकांच्या मृत्यूवर शोक करत असताना भाजपा युद्धाचा वापर राजकीय खेळी म्हणून करत आहे. चार दिवसांच्या युद्धानंतर काय झालं? कोणी आत्मसमर्पण केलं? आम्हाला माहित नाही" असं म्हटलं आहे. 

युद्धविरामाच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक न बोलावल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आणि युद्ध सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती याची आठवण करून दिली. रेवंत रेड्डी म्हणाले की, "तुम्हाला आमची गरज असताना तुम्ही आम्हाला बोलावलं. आम्ही सैन्यासोबत उभे राहिलो. पण युद्धविराम करताना तुम्ही आम्हाला सामील केलं नाही. पाकिस्तानने किती राफेल जेट विमानं नष्ट केली? याबद्दल कोणीही का बोलत नाही? नागरिक आणि राजकीय पक्षांची वारंवार मागणी असूनही पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यात सरकार अपयशी ठरत आहे."

"जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणला असता"

"राहुल गांधींनी परिस्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळली असती. जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी पीओके परत आणला असता. मोदी हे १००० रुपयांच्या नोटेसारखे आहेत. आपल्याला राहुल गांधींसारखे नेते हवे आहेत. मोदी आपल्यासाठी कधीही युद्ध जिंकू शकत नाहीत. पंतप्रधान म्हणून फक्त राहुल गांधीच हे करू शकतात" असं रेड्डी यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी पाकिस्तानशी झालेल्या संघर्षादरम्यान काँग्रेसने सरकारला पूर्ण पाठिंबा दिला होता. रेड्डी यांनी भाजपाच्या तिरंगा रॅलीवरही हल्लाबोल केला आणि ही रॅली खरोखरच पहलगाम हल्ल्यातील लोक आणि युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ आयोजित केली जात आहे का? असा सवाल विचारला.

"युद्ध म्हणजे फक्त भाषण देणं नाही"

मोदी सरकारची तुलना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाशी करताना रेड्डी म्हणाले, "युद्ध म्हणजे फक्त भाषण देणं नाही. धैर्य, दृढनिश्चय आणि रणनीती आहे. अमेरिकेने पाकिस्तानला पाठिंबा दिला तेव्हाही इंदिरा गांधी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्या आणि भारताने १९७१ चे युद्ध जिंकलं. पण आज चीनने आपल्या ४,००० चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे, सूर्यपेटचे आमचे जवान कर्नल सुरेश बाबू यांना मारलं आहे आणि आपले पंतप्रधान गप्प आहेत." 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरTelanganaतेलंगणा