शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

तेलंगणा विधानसभा मुदतीपूर्वीच बरखास्त, मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 2:00 PM

तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने विधानसभा बरखास्त करून मुदतपूर्व निवडणुका घेण्याची शिफारस राज्यपालांकडे केली आहे.

हैदराबाद - तेलंगणामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन राज्याची विधानसभा बरखास्त करण्याची  शिफारस राज्यपालांकडे केली. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारला असून, राज्याची विधानसभा बरखास्त केली आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच तेलंगाणामध्ये विधानसभेसाठी रणधुमाळी रंगणार आहे. 

 नव्याने अस्तित्वात आलेल्या तेलंगाणामध्ये 2014 साली विधानसभेसाठी पहिल्यांदाच निवडणूक झाली होती. तेलंगाणा विधानसभेची मुदत 2019 मध्ये संपणार असून, विधानसभा आणि लोकसभेसाठी एकत्रच निवडणूक होणे नियोजित होते. मात्र राज्यातील राजकीय समिकरणांचा विचार करून विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय चंद्रशेखर राव आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आज झालेल्या घेतला आहे. दरम्यान, तेलंगणाचे राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव स्वीकारला आहे.

 

तेलंगणामध्ये काँग्रेस आणि टीडीपीमध्ये जवळीक वाढत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढण्याची शक्यता आहे. तसेच मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळण्याचा अंदाज आहे. तसे झाल्याच तेलंगणामध्येही काँग्रेसला बळ मिळून त्यांचा सामना करणे टीआरएसला जड जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यातील विधानसभेची निवडणूक उरकून संभाव्य आव्हान टाळण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी मुदतपूर्व निवडणुकीचा मार्ग निवडला आहे.119 सदस्यांच्या तेलंगणा विधानसभेमध्ये सध्या टीआरएसचे 90 सदस्य असून, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे 13 तर भाजपाचे पाच सदस्य आहेत.  

टॅग्स :TelanganaतेलंगणाPoliticsराजकारणnewsबातम्या