शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:12 IST

BJP MLA T Raja Singh: तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा ...

BJP MLA T Raja Singh:तेलंगणामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आमदार राजा सिंह यांनी सोशल मीडिया पोस्टवर ही माहिती दिली आहे. राजा सिंह हे तेलंगणाचे एक फायरब्रँड नेते म्हणून ओळखले जातात. तेलंगणाच्या भाजप अध्यक्षपदी नव्या व्यक्तीच्या निवडीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. आमदार टी. राजा सिंह यांनी पक्षाध्यक्षपदासाठी दावा केला होता. मला माहित आहे की ते मला हे पद देणार नाहीत, पण प्रयत्न करण्यात काय हरकत आहे? असं त्यांनी म्हटलं होतं.

तेलंगणाचे फायरब्रँड नेते आणि गोशामहलचे आमदार टी राजा सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. प्रदेश भाजप अध्यक्षपदासाठी एन रामचंद्र राव यांच्या नावावर हायकमांडने सहमती दर्शवली. यामुळे संतप्त झालेल्या टी राजा सिंह यांनी आपला राजीनामा विद्यमान प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांना पाठवला आहे. राजा सिंह हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. मात्र प्रदेशाध्यक्षपदी निवड न झाल्याने नाराजी व्यक्त करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली.

भाजपमधून राजीनामा दिल्यानंतर टी राजा सिंह यांनी एक्सवर दोन पत्रे शेअर केली आहेत. याच्यासोबत कॅप्शनमध्ये, "लोकांचा शांत असण्याचा अर्थ संमती म्हणून घेऊ नये. मी फक्त माझ्यासाठी नाही तर असंख्य कार्यकर्त्यांसाठी आणि मतदारांसाठी बोलत आहे जे विश्वासाने माझ्यासोबत उभे राहिले आणि आज निराश आहेत," असं म्हटलं.

"मी पक्षापासून वेगळा होत असलो तरी, मी हिंदुत्वाच्या विचारसरणीशी आणि आमच्या धर्माची आणि गोशामहलच्या लोकांची सेवा करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. मी माझा आवाज उठवत राहीन आणि हिंदू समुदायासोबत आणखी मजबूतपणे उभा राहीन. हा एक कठीण निर्णय आहे, पण आवश्यक आहे. अनेकांच्या मौनाला संमती म्हणून घेऊ नये. मी फक्त माझ्यासाठी नाही तर आमच्यासोबत विश्वासाने उभे राहिलेल्या आणि आज निराश झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी आणि मतदारांसाठी बोलतो," असं टी राजा सिंह यांनी म्हटलं.

"मी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाला - माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, अमित शाह आणि बीएल संतोष जी यांनाही नम्रपणे आवाहन करतो की त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा. तेलंगणा भाजपसाठी तयार आहे, पण आपण त्या संधीचा सन्मान करण्यासाठी योग्य नेतृत्व निवडले पाहिजे आणि ती संधी हातून जाऊ देऊ नये," असेही राजा सिंह म्हणाले. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाBJPभाजपा