शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 06:34 IST

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया अत्यंत सतर्क असून, सोमवारी दोन विमाने तांत्रिक दोषामुळे उड्डाणानंतर परतली.

नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर एअर इंडिया अत्यंत सतर्क असून, सोमवारी दोन विमाने तांत्रिक दोषामुळे उड्डाणानंतर परतली. फ्रँकफर्टहून हैदराबादकडे निघालेल्या विमानात बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर तर रविवारी एअर इंडियाचे दिल्लीहून बडोद्याला जाणारे एक विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच परत उतरवण्यात आले होते. 

लँड झाल्यानंतर विमानाच्या टायरमधून निघू लागला धूर  सौदी एअरलाइनचे एक विमान २४२ हज यात्रेकरूंना घेऊन जेद्दाहहून लखनौत उतरले. परंतु, लँडिंगनंतर या विमानाच्या टायरमधून धूर निघू लागला. कोणतीही दुर्घटना झाली नाही.

लुफ्तान्साचे विमान पुन्हा विमानतळावरलुफ्तान्सा विमान कंपनीच्या फ्रँकफर्ट ते हैदराबाद या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर ते पुन्हा फ्रँकफर्ट येथे उतरवण्यात आले. कंपनीच्या ‘एलएच ७५२’ या विमानाने फ्रँकफर्ट विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हैदराबाद विमानतळावर सोशल मीडियाद्वारे या विमानात बॉम्ब असल्याची धमकी आली. याची सूचना संबंधित वैमानिकाला दिल्यानंतर तातडीने हे विमान पुन्हा फ्रँकफर्ट येथे उतरवण्यात आले.

ड्रीमलायनरची धास्ती ! हाँगकाँगहून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या विमानात काही दोष असल्याची शंका आल्यांनतर हे विमान उड्डाणानंतर काही वेळातच हाँगकाँगला परतले. हे बोईंग-७८७-८ ड्रिमलायनर विमान होते. परतल्यावर या विमानाची तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाIndiaभारतPlane Crashविमान दुर्घटना