शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

नारीशक्तीचा विजय असो... 'जग जिंकून' मायदेशी परतल्या भारताच्या सहा 'जलसम्राज्ञी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 20:00 IST

चार खंड, तीन महासागर आणि तब्बल 21 हजार 600 नॉटिकल मैल अंतर पार करत भारतीय नौदलाच्या रणरागिणींनी इतिहास रचला आहे. आठ महिन्यांपूर्वी 10 सप्टेंबर रोजी  आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघालेल्या नौदलाच्या सहा रणरागिणी सोमवारी दीर्घ प्रवासानंतर मायभूमीवर परतल्या.

पणजी - चार खंड, तीन महासागर आणि तब्बल 21 हजार 600 नॉटिकल मैल अंतर पार करत भारतीय नौदलाच्या रणरागिणींनी इतिहास रचला आहे. आठ महिन्यांपूर्वी 10 सप्टेंबर रोजी  आयएनएस तारिणी नौकेवरून पृथ्वी प्रदक्षिणेवर निघालेल्या नौदलाच्या सहा रणरागिणी सोमवारी दीर्घ प्रवासानंतर मायभूमीवर परतल्या. या दलाचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांनी केले.  पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण करून परतलेल्या या रणरागिणींचे स्वागत नौदलप्रमुख अॅडमिरल सुनील लांबा आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.  वर्तिका जोशी यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, स्वाती पी., लेफ्टनंट ऐश्वर्या बोड्डापती, एस. विजया देवी आणि पायल गुप्ता यांचा समावेश होता. या पृथ्वीप्रदक्षिणेसाठी वापरण्यात आलेल्या आयएनएस तारिणीबाबत माहिती देताना लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल म्हणाल्या, आयएनएस म्हादेईनंतर आयएनएस तारिणी ही अशा प्रकारची दुसरी नौका आहे. तिची बांधणी समुद्रातील वादळांचा सामना करण्यासाठी सक्षम अशी करण्यात आली आहे. वुडन फायबर-ग्लासने बनलेली ही नौका अनेक बाबतीत उत्तम असून, या प्रवासात तिने स्वत:ला सिद्ध केले आहे. दरम्यान, जगप्रदक्षिणा पूर्ण करून परतलेल्या भारताच्या जलसम्राज्ञींचे स्वागत करताना संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या,"  तुम्ही मिळवलेल्या यशाबाबत मी आनंदी आहे. भारताची युवा पिढी जे काही मिळवत आहेत, ते महिला आणि पुरुष दोघांसाठीही खूप प्रेरणादायी आहे." 

   मोठ्या संकटाचा सामना 

एकूण २५४ दिवसांच्या या प्रवासात १९४ दिवस या महिला अधिका-यांनी समुद्रात घालवले. या परिक्रमेत सहभागी पथकाचे नेतृत्त्व करणाº-या लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी यांनी अनुभव कथन करताना सांगितले की, ‘पहिले विषुववृत्त ओलांडल्यानंतर प्रवासाला गती आली. २३ आॅक्टोबर रोजी बोट आॅस्ट्रेलियात पोचली. तेथे बंदरात १२ दिवस राहिलो. ७ नोव्हेंबर रोजी प्रवासात असतानाच पायल हिचा वाढदिवस साजरा केला. केप होर्न बंदर ओलांडण्याआधीच मोठ्या संकटाचा सामना या अधिका-यांना करावा लागला. खराब हवामानामुळे समुद्र खवळला होता ताशी ६0 किलोमिटर वेगाने वाहणारे वारे आणि ८ मीटर उंचीच्या लाटा यातून मार्ग काढावा लागला. प्रत्यक्षात यमदूतच परीक्षा घेत होता. शेवटी हे बंदर पार करुन २६ फेब्रुवारी रोजी फॉकलँड बेटावर पोचलो. 

 बोटीच्या स्टीअरिंगमध्ये बिघाड 

पोर्ट लुईपासून १८0 सागरी मैल अंतरावर असताना बोटीच्या स्टीअरिंगमध्ये बिघाड झाला. समुद्रातच तात्पुरती दुरुस्ती करुन बोट बंदरात आणावी लागली. नौदलाने तात्काळ सुटे भाग पुरविल्याने लवकर दुरुस्ती झाली आणि पुढच्या प्रवासाला लागलो.  २८ एप्रिल रोजी पोर्ट लुई बंदरातून परतीच्या प्रवासाला लागलो. ६ मे रोजी विषुववृत्त पार केले. 

 उद्या पंतप्रधानांची भेट 

सागरी परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण करुन परतलेले नौदल महिला अधिका-यांचे हे पथक उद्या बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून या साहसी प्रवासाचा अनुभव त्यांना कथन करणार आहे. मोदीजी या अधिका-यांशी संवाद साधतील. कार्यक्रमाला नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुनिल लांबा तसेच नौदलाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :indian navyभारतीय नौदलIndiaभारत