शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

चीनला धडा शिकवा, चिनी वस्तूंवर बहिष्कार घाला, डॉ. आठवलेंचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 17:30 IST

कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील 6 कोटी लोक गरिबीच्या कचाट्यात सापडणार आहेत, अशा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. संकटावर मात करण्यासाठी मोहिमेचा एक भाग म्हणून जागतिक बँकेनं

मुंबई - जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाने भारतातही थैमान घातल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळेच देशात लॉकडाऊनचा ४ था टप्पा सुरु झाला आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये देशात कोरोनाचे १ लाखांपेक्षा अधिक रुग्ण झाले आहेत. तर, लॉकडाऊनमुळे अनेकांचे हाल होत आहेत. गरिब, मजूर आणि कामगार वर्गाला या लॉकडाऊनचा मोठा फटका बसला असून सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून हा व्हायरल जगभर पसरला आहे. त्यामुळे, चीनविरुद्ध अनेक देशांनी राग आवळला आहे. भारतीय नागरिकांमध्येही चीनबद्दल तीव्र संताप दिसून येतो. त्यामुळेच, टीकटॉकवर बंदी घाला, अनइन्स्टॉल करा, असे आवाहन तरुणाई करताना दिसत आहे. आता केंद्रीयमंत्र्यांनी चिनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.  

कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरातील 6 कोटी लोक गरिबीच्या कचाट्यात सापडणार आहेत, अशा इशारा जागतिक बँकेनं दिला आहे. संकटावर मात करण्यासाठी मोहिमेचा एक भाग म्हणून जागतिक बँकेनं 100 विकसनशील देशांना 160 अब्ज डॉलर्सची मदत देण्याची घोषणा केली आहे. ही सर्व रक्कम 15 महिन्यांच्या कालावधीत दिली जाणार आहे. कोरोनाचा फटका जगभरातील बहुतांश विकसित व विकसनशील देशांना बसला आहे. त्यामुळेच, चीनवर कारवाई करण्याची मागणी अमेरिकेनं केली होती. तर, भारतीय नागरिकांमध्येही चीनविरुद्ध संताप आहे. त्यामुळेच, भारतीय नागरिकही सोशल मीडियावरुन चीनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याची मोहित राबवताना दिसत आहे. आता, खुद्द केंद्रीयमंत्र्यांनी चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे. 

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांनी चिनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे. आठवले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर करत, चीनमुळेच कोरोना जगभरात पसरला असून आपल्या भारत देशालाही त्याचा फटका बसल्याचे सांगत, चीनी उत्पादनावर बहिष्कार घालण्याचं सूचवलं आहे. कोरोनामुळे जगभरात ३ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या १ लाखाच्या पुढे गेली आहे. तर, महाराष्ट्रातही कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या ३५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे, चीनविरुद्ध अनेकांच्या मनात राग आहे. चीनला धडा शिकविण्यासाठी, चिनी उत्पादनावर बहिष्कार घालावा, असं आवाहन डॉ. आठवले यांनी केलं आहे. 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेchinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या