शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Lockdown: टाटा ट्रस्टचा सर्वे: लॉकडाऊनमध्ये पोलिसांना 'या' गोष्टीचा सर्वाधिक त्रास; पण फायदाही झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 14:09 IST

Police behavior in lockdown: टाटा ट्रस्ट, सीएसडीएसने कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळच्या लॉकडाऊनवेळी दहा राज्यांच्या पोलिसांची सामान्य लोकांशी वागणूक यावर एक रिपोर्ट तयार केला आहे. यामध्ये 40 प्रश्न पोलिसांना आणि 40 प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. 

कोरोना काळात (Corona Pandemic) सर्वाधिक त्रास जर कोणत्या यंत्रणेला झाला असेल तर तो आरोग्य आणि पोलिसांना. पहिल्या लॉकडाऊन (First Lockdown) काळात या परिस्थितीचा कोणीच अनुभव घेतला नव्हता. यामुळे लोकांच्या प्रश्नांना तोंड देणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांची तपासणी करणे आदी कामे जोखिम पत्करून करावी लागत होता. याच काळात घरगुती हिंसा आणि सायर क्राईमचे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणावर वाढले होते. लोकनीति, टाटा ट्रस्ट, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसाइटीज़ने सर्वे केला आहे. त्यातून ही बाब समोर आली आहे. (Lockdown Survey: Police used force during lockdown but were helpful too)

टाटा ट्रस्ट, सीएसडीएसने कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळच्या लॉकडाऊनवेळी दहा राज्यांच्या पोलिसांची सामान्य लोकांशी वागणूक यावर एक रिपोर्ट तयार केला आहे. यामध्ये 40 प्रश्न पोलिसांना आणि 40 प्रश्न नागरिकांना विचारण्यात आले. 

82 टक्के पोलिसांनी सांगितले की प्रवासी मजुरांनी लॉकडाऊन लागला तेव्हा खूप त्रास दिला. त्यांना सांभाळण्यासाठी, नियंत्रणासाठी 49 टक्के पोलिसांनी सांगितले की बळाचा वापर करावा लागला. 64 टक्के नागरिकांना सांगितले की, सरकारने लॉकडाऊन लावण्याआधी काही वेळ द्यायला हवा होता. 45 टक्के पोलिसांनी सांगितले की, रस्त्यावर सामान्य नागरिकांसोबत ट्रॅव्हल पासवरून सर्वाधिक बाचाबाची झाली. श्रीमंतांनी आम्हाला चांगली वागणूक दिली तसेच कायदा पाळण्यासाठी मदत केली. 24 टक्के पोलिसांनी सांगितले की, गरीब लोकांनी आम्हाला सर्वाधिक पाठिंबा, मदत केली. 

पोलिसांना काय फायदा झाला....सर्वेमध्ये लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये लॉकडाऊन काळात पोलिसांनी आपले काम इमानदारीने केल्याचे 86 टक्के नागरिकांनी सांगितले. 65 टक्के लोकांनी पोलिसाच्या नेहमीच्या वागणुकीपेक्षा त्यावेळची वागणूक चांगली होती, त्यांची प्रतिमा सुधारली आहे, असे सांगितले. तर 32 टक्के लोकांनी पोलिसांच्या प्रतिमेत काहीच सुधार झाला नसल्याचे सांगितले. 36 टक्के लोकांनी पोलिसांनी नियम पाळण्यासाठी अधिकारांची भीती दाखविल्याचे सांगितले. 55 टक्के लोक दंड, मारहाण, कोरोना टेस्टला घाबरल्याचे यामध्ये दिसले.

57 टक्के लोक घरातच

55 टक्के लोक दंड, मारहाण, कोरोना टेस्टला घाबरल्याचे यामध्ये दिसले. 57 टक्के लोकांना पोलिसांची भीती वाटत होती, म्हणून ते घराबाहेर पडले नाहीत. 43 टक्के लोकांना पोलिस त्यांना पकडून घेऊन जातील आणि कोरोना चाचणी करतील अशी भीती होती. तेवढ्याच लोकांना पोलीस अटक करतील अशी भीती होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसTataटाटा