शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज! तिसरी कोरोना लस लवकरच; भारतात टाटा ग्रुप करणार 'मॉडर्ना' लॉन्च?

By देवेश फडके | Updated: January 25, 2021 16:05 IST

टाटा ग्रुपकडून मॉर्डना कंपनीची कोरोना लस भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असून, भारताला लवकरच तिसरी कोरोना लस मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देटाटा समूह भारतात लॉन्च करणार मॉडर्ना कोरोना लसदोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहितीभारताला कोरोना लसीचा तिसरा पर्याय मिळणार असल्याची चर्चा

नवी दिल्ली :टाटा ग्रुपकडून मॉर्डना कंपनीची कोरोना लस भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असून, भारताला लवकरच तिसरी कोरोना लस मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. 

इकॉनॉमिक टाइम्स यांनी दिलेल्या एका वृत्तानुसार, टाटा समूहाची आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेली कंपनी टाटा मेडिकल अँड डायग्नोस्टिक भारतात कोरोना लस लॉन्च करण्यासाठी अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीशी चर्चा करत आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

सरकारी नियमानुसार, कोणत्याही परदेशातील कंपनीची कोरोना लस भारतात आणायची असेल, तर देशातील स्वयंसेवकांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या करणे आवश्यक आहे. टाटा समूहाला भारतात कोरोना लस आणायची असेल, तर केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद यांच्यासह मॉडर्ना लसीची चाचणी करावी लागणार आहे. 

मॉडर्ना कोरोना लस ही ९४.१ टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. मॉडर्ना कोरोना लसीच्या वापराला अमेरिकेसह कॅनडा, ब्रिटन येथेही मंजुरी देण्यात आली आहे. उणे २० अंश तापमानात ठेवल्यास ही लस सहा महिने टिकू शकते. मॉडर्ना लसीची परिणामकारकता अधिक असून, याचे दुष्परिणाम कमी आहेत, असा दावा केला जात आहे. 

दरम्यान, भारतात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिलेली पहिली कोरोना लस सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि एक्स्ट्राजेनेका यांच्या मदतीने तयार केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड लसीसह भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली असून, १६ जानेवारी रोजी भारतात देशव्यापी कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत १६ लाख १५ हजार ५०४ जणांना कोरोना लस देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

तत्पूर्वी भारताने २० जानेवारी २०२१ पासून शेजारी देशांना कोरोना लसीचा पुरवठा सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यात भूतान, मालदीव, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, मॉरिशियस आणि सेशल्स या देशांना कोरोना लसीचे हजारो डोस पाठवण्यात आले आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसTataटाटाIndiaभारत