शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

आजच्याच दिवशी 75 वर्षांपूर्वी एअर इंडियाचा पहिला परदेश दौरा; मुंबई ते लंडनचे भाडे फक्त 1720 रुपये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 17:32 IST

जेआरडी टाटा स्वतः मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर विमानाला निरोप देण्यासाठी पोहोचले होते.

नवी दिल्ली: 75 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी म्हणजेच 8 जून 1948 रोजी एअर इंडियाच्याविमानाने पहिल्यांदा परदेशात उड्डाण केले होते. एअर इंडियाने पहिल्यांदाच 35 प्रवाशांसह परदेशी भूमीवर पाऊल ठेवले. आज 8 ते 10 तासांमध्ये होणाऱ्या प्रवासाला तेव्हा दोन दिवस लागले होते. एअर इंडियाच्या मलबार प्रिन्सेस विमानाने मुंबई(तेव्हा बॉम्बे)वरुन लंडनसाठी पहिले उड्डाण केले होते. 

48 तासांत पूर्ण झाला प्रवासकायरो आणि नंतर जिनिव्हा मार्गे एअर इंडियाचे पहिले परदेशात उड्डाण यशस्वीपणे पूर्ण करणारे कॅप्टन केआर गुजदार यांनी या विमानाचे नेतृत्व केले होते. एअर इंडियाने मुंबई ते लंडन हे पहिले उड्डाण 48 तासांत पूर्ण केले होते. एअर इंडियाच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विमानतळावर मोठी गर्दी झाली होती. टाटा एअर इंडियाच्या फ्लाइटमधून लंडनला जाणाऱ्या व्यक्तींची छायाचित्रे काढण्यात पत्रकारांनी मोठी गर्दी केली होती. एअर इंडियाची मलबार प्रिन्सेस 35 प्रवाशांसह नियोजित वेळेवर निघाली. यातील 29 प्रवासी लंडनला तर 6 जण जिनिव्हाला उतरले होते.

विमानात कोण कोण होते...एअर इंडियाने 3 जून 1948 रोजी टाइम्स ऑफ इंडियामध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी पूर्ण पानाची जाहिरात केली होती. पहिल्या आंतरराष्ट्रीय विमानाचे तिकीट फक्त 1720 रुपये होते. पायलट व्यतिरिक्त फ्लाइटचे क्रू मेंबर्सही खूप उत्साहित होते. निळा कोट आणि स्काय ब्लू स्कर्ट घातलेली एअर होस्टेसही तिच्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी सज्ज होती. जेआरडी टाटा स्वतः मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावर विमानाला निरोप देण्यासाठी पोहोचले होते. या विशेष विमानात महाराजा दुलीप सिंग, काही इंग्रज आणि व्यापाऱ्यांसह काही खेळाडूदेखील होते. आज या प्रवासाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTataटाटाairplaneविमानAirportविमानतळ