शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

तेजपालला दिलासा नाहीच, म्हापसा न्यायालयात खटला चालणारच, २८ रोजी होणार आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 19:57 IST

लैंगिक छळणूक प्रकरणात तहेलका नियतकालिकेचे संपादक तरूण तेजपाल याच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयात खटला चालविण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी करण्यात आलेली  तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळली.

पणजी, दि. २६ - लैंगिक छळणूक प्रकरणात तहेलका नियतकालिकाचे संपादक तरूण तेजपाल याच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयात खटला चालविण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी करण्यात आलेली  तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे तेजपालवर २८ सप्टेंबर रोजी म्हापसा सत्र न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार आहेत. सहकारी पत्रकार महिलेवरील बलात्कार  प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यावर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया म्हापसा न्यायालयात सुरू केली असता त्याला तेजपालने आक्षेप घेतला होता. ही कारवाई त्वरित रोखण्यात यावी यासाठी खंडपीठात याचिका दाखल करण्या आली होती. तांत्रिक बाजूवर बोट ठेऊन या प्रकरणात खंडपीठाने हस्तक्षेप करण्याची मागणी तेजपालचे वकील अमन लेखी यांनी केली होती. तेजपालला खोट्या प्रकरणात गुंतविण्यात आल्याचे म्हटले होते. क्राईम ब्रँचने त्याला जोरदार आक्षेप घेतला होता. काय खरे आणि काय खोटे याचा छडा खटला चालवूनच लावणे योग्य होईल असे अ‍ॅड सरेश लोटलीकर यांनी न्यायालयाला सांगितले होते.  मंगळवारी या प्रकरणात निवाडा देताना तेजपालची याचिका खंडपीठाने फेटाळली. तसेच या प्रकरणाचा खटला म्हापसा न्यायालयात चालणार असल्याचे सांगितले. २८ सप्टेंबर रोजी म्हापसा न्यायालयात तेजपालवर आरोप निश्चित केले जातील. दरम्यान तेजपाल यांना दिलासा दिला नसला तरी त्यांची याचिकाही निकालात काढण्यात आलेली नाही. हे प्रकरण पुन्हा नोव्हेंबर रोजी सुनावणीस येणार आहे.या प्रकरणात तेजपालविरुद्ध निश्चित करण्यात आलेल्या आरोपांना खंडपीठाची मंजुरी मिळाल्यानंतरच खटला सुरू करण्यात यावा असेही खंडपीठाने सुनावले. 

 ‘न्यायाधीश नव्हे, आक्षेप निरर्थक’आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे निरर्थक असल्याचे स्पष्ट करूनही आणि आपल्याविरुद्ध ज्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले ती कलमे आपल्याविरोधात लागू होत नाही हे सांगूनही म्हापसा न्यायालयाने त्याची दखल घेतली नाही. या प्रकरणात आदेश देताना न्यायाधिशाने बुद्धीचा वापर केला नाही असे तेजपालचे वकील लेखी यांनी खंडपीठात न्यायमूर्ती पृथ्विराज चव्हाण यांच्यासमोर केला. परंतु  क्राईम ब्रँचचे वकील अ‍ॅड सरेश लोटलीकर यांनी जोरदार आक्षेप घेताना म्हापसा न्यायालयाने त्यांना बाजू मांडण्यासाठी पूर्ण वेळ दिली होती आणि आदेश सुनावताना ४७ पानी स्पष्टीकरणही दिले होते असे सांगितले. तेवढे सांगून ते म्हणाले की ‘न्यायाधीशाने बुद्धीचा वापर केला नाही हे चुकीचे असून वास्तवीक तुमचे आक्षेप निरर्थक आहेत’ असे सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारCrimeगुन्हाIndiaभारत