शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

तेजपालला दिलासा नाहीच, म्हापसा न्यायालयात खटला चालणारच, २८ रोजी होणार आरोप निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 19:57 IST

लैंगिक छळणूक प्रकरणात तहेलका नियतकालिकेचे संपादक तरूण तेजपाल याच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयात खटला चालविण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी करण्यात आलेली  तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळली.

पणजी, दि. २६ - लैंगिक छळणूक प्रकरणात तहेलका नियतकालिकाचे संपादक तरूण तेजपाल याच्याविरुद्ध म्हापसा न्यायालयात खटला चालविण्यासाठी होणारी प्रक्रिया थांबविण्यासाठी करण्यात आलेली  तरुण तेजपालची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे तेजपालवर २८ सप्टेंबर रोजी म्हापसा सत्र न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार आहेत. सहकारी पत्रकार महिलेवरील बलात्कार  प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आल्यावर आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया म्हापसा न्यायालयात सुरू केली असता त्याला तेजपालने आक्षेप घेतला होता. ही कारवाई त्वरित रोखण्यात यावी यासाठी खंडपीठात याचिका दाखल करण्या आली होती. तांत्रिक बाजूवर बोट ठेऊन या प्रकरणात खंडपीठाने हस्तक्षेप करण्याची मागणी तेजपालचे वकील अमन लेखी यांनी केली होती. तेजपालला खोट्या प्रकरणात गुंतविण्यात आल्याचे म्हटले होते. क्राईम ब्रँचने त्याला जोरदार आक्षेप घेतला होता. काय खरे आणि काय खोटे याचा छडा खटला चालवूनच लावणे योग्य होईल असे अ‍ॅड सरेश लोटलीकर यांनी न्यायालयाला सांगितले होते.  मंगळवारी या प्रकरणात निवाडा देताना तेजपालची याचिका खंडपीठाने फेटाळली. तसेच या प्रकरणाचा खटला म्हापसा न्यायालयात चालणार असल्याचे सांगितले. २८ सप्टेंबर रोजी म्हापसा न्यायालयात तेजपालवर आरोप निश्चित केले जातील. दरम्यान तेजपाल यांना दिलासा दिला नसला तरी त्यांची याचिकाही निकालात काढण्यात आलेली नाही. हे प्रकरण पुन्हा नोव्हेंबर रोजी सुनावणीस येणार आहे.या प्रकरणात तेजपालविरुद्ध निश्चित करण्यात आलेल्या आरोपांना खंडपीठाची मंजुरी मिळाल्यानंतरच खटला सुरू करण्यात यावा असेही खंडपीठाने सुनावले. 

 ‘न्यायाधीश नव्हे, आक्षेप निरर्थक’आपल्यावर ठेवण्यात आलेले आरोप हे निरर्थक असल्याचे स्पष्ट करूनही आणि आपल्याविरुद्ध ज्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले ती कलमे आपल्याविरोधात लागू होत नाही हे सांगूनही म्हापसा न्यायालयाने त्याची दखल घेतली नाही. या प्रकरणात आदेश देताना न्यायाधिशाने बुद्धीचा वापर केला नाही असे तेजपालचे वकील लेखी यांनी खंडपीठात न्यायमूर्ती पृथ्विराज चव्हाण यांच्यासमोर केला. परंतु  क्राईम ब्रँचचे वकील अ‍ॅड सरेश लोटलीकर यांनी जोरदार आक्षेप घेताना म्हापसा न्यायालयाने त्यांना बाजू मांडण्यासाठी पूर्ण वेळ दिली होती आणि आदेश सुनावताना ४७ पानी स्पष्टीकरणही दिले होते असे सांगितले. तेवढे सांगून ते म्हणाले की ‘न्यायाधीशाने बुद्धीचा वापर केला नाही हे चुकीचे असून वास्तवीक तुमचे आक्षेप निरर्थक आहेत’ असे सांगितले.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारCrimeगुन्हाIndiaभारत