शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

'5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य वास्तववादी', पंतप्रधान मोदींनी थेट आकडेवारीच मांडली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 21:40 IST

'2014 साली भारताची अर्थव्यवस्था दोन ट्रिलियन होती, ती 2023 मध्ये साडेतीन ट्रिलियन झाली.'

नवी दिल्ली: भारताचीअर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे आणि आगामी काळातही भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. तसेच, आगामी काळासाठी 5 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आम्ही ठेवल्याचे सांगत थेट आकडेवारीच मांडली. 

पीएम मोदींनी इंडिया टुडे ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले की, 'आमचा ट्रॅक रेकॉर्ड बोलतोय. 2001 मध्ये मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार सुमारे 26 अब्ज डॉलर (2.17 लाख कोटी रुपये) होता. मी पंतप्रधान होण्यासाठी गुजरात सोडले, तेव्हा गुजरातच्या अर्थव्यवस्थेचा आकार 133.5 अब्ज डॉलर्स (11.1 लाख कोटी रुपये) झाला. आम्ही केलेल्या अनेक धोरणांचा आणि सुधारणांचा परिणाम म्हणून, आज गुजरातची अर्थव्यवस्था सुमारे 260 अब्ज डॉलर्स (21.6 लाख कोटी रुपये) इतकी झाली आहे.'

'त्याचप्रमाणे 2014 मध्ये मी पंतप्रधान झालो, तेव्हा भारताची अर्थव्यवस्था 2 ट्रिलियन डॉलर्स (167 लाख कोटी रुपये) होती आणि 2023-24 च्या अखेरीस भारताचा अर्थव्यवस्था 3.75 ट्रिलियन डॉलर (312 लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त झाली आहे. आगामी काळात ही आणखी वाढणार आहे. हा 23 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड दर्शवितो की, आमचे लक्ष्य वास्तववादी लक्ष्य आहे,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विरोधक महागाईवरुन आरोप करतात, त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'शतकातील सर्वात मोठी कोरोनासारखी महामारी आली. यामुळे जागतिक पुरवठा साखळी उद्ध्वस्त झाली, जगभरात मंदीचा दबाव निर्माण झाला. अशा काळातही भारताने चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीत 2014-15 आणि 2023-24 (नोव्हेंबरपर्यंत) सरासरी महागाई दर केवळ 5.1 टक्के होता. मागील 10 वर्षांमध्ये (2004-14) हा 8.2 टक्के होता.'

विरोधकांच्या रोजगाराच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले की, '2023-24 च्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटी रुपयांपर्यंत लक्षणीय वाढ केली. 2013-14 मध्ये यावर फक्त 1.9 लाख कोटी रुपये खर्च केला होता. भारताने 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत मेट्रो मार्गांची लांबी 248 किमीवरून 905 किमीपर्यंत नेली, त्यातून रोजगार निर्माण नाही झाला का? भारताने 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत विमानतळांची संख्या 74 वरून 149 वर नेली, त्यातून रोजगार निर्माण झाला नाही का? 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 387 वरून 706 पर्यंत वाढली, त्यातून रोजगार निर्माण झाला नाही का?'

'2014 च्या तुलनेत रस्त्यांचे बांधकाम दुप्पट झाले, त्यातून रोजगार निर्माण झाला नाही का? आम्ही श्रमशक्तीचा सहभाग वाढवला. 2018-19 मध्ये 50.2 टक्क्यांवरुन 2022-23 मध्ये 57.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. 31 मार्च 2022 रोजी ईपीएफओचे 27.74 कोटी सदस्य होते, तर 31 मार्च 2014 रोजी केवळ 11.78 कोटी सदस्य होते. रोजगाराच्या संधी किंवा नोकऱ्या वाढल्या आहेत, याचे हे आकडे साक्षीदार आहेत,' असंही पीएम मोदी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतEconomyअर्थव्यवस्थाcongressकाँग्रेसBJPभाजपा