तामिळनाडूला केंद्राशी संघर्ष केल्यावर निधी कसा मिळेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 06:29 IST2026-04-13T06:27:25+5:302026-04-13T06:29:08+5:30
Tamil Nadu Assembly Election 2026: अण्णा द्रमुकचे अध्यक्ष ई. के. पलानीस्वामी यांनी राज्याला निधी देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी द्रमुक सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारशी हा पक्ष मुद्दाम संघर्ष करत असताना राज्य सरकारला निधी कसा मिळेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तामिळनाडूला केंद्राशी संघर्ष केल्यावर निधी कसा मिळेल
तंजावर (तामिळनाडू) : अण्णा द्रमुकचे अध्यक्ष ई. के. पलानीस्वामी यांनी राज्याला निधी देण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी द्रमुक सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारशी हा पक्ष मुद्दाम संघर्ष करत असताना राज्य सरकारला निधी कसा मिळेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
तामिळनाडूतील अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) एक घटक पक्ष असलेल्या अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघमचे (एएमएमके) सरचिटणीस टी. टी. व्ही. दिनकरन यांच्यासोबत संयुक्त प्रचारसभेत बोलताना पलानीस्वामी शनिवारी म्हणाले की, निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांमध्ये मतभेद असू शकतात किंवा ते एकमेकांवर टीका करू शकतात; परंतु निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सरकारने जनतेची सेवा केली पाहिजे.
द्रमुक निधीबाबत अपयशी
राज्य सरकार जर जाणूनबुजून भाजपवर टीका करीत असेल तर तामिळनाडूला निधी कसा मिळेल? केंद्रात काँग्रेससोबत सत्तेत असतानासुद्धा द्रमुकला आवश्यक निधी मिळाला नव्हता.
आता केंद्राशी सलोख्याचे संबंध राखण्यात अपयशी ठरल्यानंतर ते भाजपवर टीका करत आहेत, अशी टीका पलानीस्वामी यांनी केली.