शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

शाळेच्या बसमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद; विद्यार्थ्यांच्या हाणमारीने घेतला एकाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 14:22 IST

तमिळनाडूमध्ये क्षुल्लक वादातून एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Crime News: शाळकरी मुलांमध्ये वर्गात किंवा शाळेच्या आवारात वाद होणं ही किरकोळ गोष्ट असते. पण गेल्या काही काळापासून शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये रागाचं प्रमाण वाढत चालल्याचे पाहायला मिळतंय. मात्र या भांडणातून नकळत एखाद्याच्या जीव देखील जाऊ शकतो. असाच काहीसा प्रकार तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात घडला. शाळेच्या बसमध्ये क्षुल्लक कारणावरुन दोन शाळकरी मुलांमध्ये जे काही घडले त्याने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.

तमिळनाडूत शाळेच्या बसमधील सीटवरून झालेल्या किरकोळ वादाने धक्कादायक वळण घेतलं. बसच्या सीटवरुन वर्गमित्राशी झालेल्या भांडणात एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. संध्याकाळी जेव्हा नववीच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या बसमध्ये सीटवर बसण्यावरुन वाद झाला. हा वाद इतका वाढला की हाणामारीपर्यंत हे प्रकरण गेलं. त्यातच एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शाळेच्या बसमध्ये सीटवरून या दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले. यावेळी एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला एवढ्या जोरात धक्काबुक्की केली की त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर सकाळी मुलाला वैद्यकीय उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. सालेम पोलिसांनी हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याला पकडले असून त्याला बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

दरम्यान, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झारखंडच्या रांचीमध्ये असाच एक प्रकार घडला होता. झारखंडमधील एका शाळेत सहावीच्या दोन मुलांमध्ये हाणामारी झाली. यानंतर एका विद्यार्थ्याने त्यांच्यावर कात्रीने हल्ला केला. त्यामुळे विद्यार्थी गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर ४० मिनिटे शाळेने मुलाला रुग्णालयात पाठवले नाही. त्यानंतर कुटुंबियांनी जखमी मुलाला रुग्णालयात नेऊन उपचार केले. ही घटना वर्गात सर्व मुलांसमोर घडली. दुसऱ्या विद्यार्थ्याने आमच्या मुलावर मागून कात्रीने हल्ला केला आणि त्याच्या डोक्यावर वार केले. यावेळी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मुलाच्या हातालाही गंभीर दुखापत झाली.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारीSchoolशाळा