शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

पाकशी आता चर्चा फक्त बळकावलेल्या काश्मीरवर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे ठाम प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 5:05 AM

भारत बालाकोटपेक्षाही मोठ्या हवाई हल्ल्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात. म्हणजे भारताने बालाकोटचा हल्ला केला होता याची आता निदान ते कबुली तरी देत आहेत, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

पंचकुला : आता यापुढे पाकिस्तानशी चर्चा झालीच तर ती फक्त त्यांनी बळकावलेल्या काश्मीरसंबंधीच होईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी येथे ठणकावून सांगितले. भाजपच्या ‘जन आशीर्वाद यात्रे’च्या शुभारंभानिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते. हरयाणा विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून ही यात्रा काढली जात आहे. सर्व ६० मतदारसंघांतून फिरून ८ सप्टेंबर रोजी तिचा रोहतकमध्ये समारोप होईल.संरक्षणमंत्री म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादास खतपाणी घालणे बंद केल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा होणे शक्य नाही आणि जरी चर्चा झालीच तरी ती त्यांनी बळकावलेल्या काश्मीरखेरीज अन्य कोणत्याही विषयावर होणार नाही.पाकिस्तान जर दहशतवादाची कास सोडणार नसेल तर त्यांच्याशी चर्चा का आणि कशावर करावी, असाही त्यांनी सवाल केला. भारताने राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७० अन्वये काश्मीरला दिलेला विशेष दर्जा रद्द केल्याने पाकिस्तान हतबल झाले असून आता काय करावे याची त्यांना चिंता लागली आहे, असे सांगून राजनाथ सिंग पुढे म्हणाले, आता पाकिस्तान आपली इभ्रत बचावण्यासाठी अनेक देशांना साकडे घालत आहे. पण अमेरिकेसारख्यासर्वात बलाढ्य देशानेही पाकिस्तानला चपराक दिली असून भारताशी चर्चा करून प्रश्न सोडवायला सांगत आहे. पाकिस्तानने भारताला धमक्या द्याव्यात असे आम्ही काय पाप केले आहे, असा सवालही त्यांनी केला. (वृत्तसंस्था)बालाकोटचा हल्ला झाला, याची पाककडूनच कबुलीभारत बालाकोटपेक्षाही मोठ्या हवाई हल्ल्याची तयारी करत असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतात. म्हणजे भारताने बालाकोटचा हल्ला केला होता याची आता निदान ते कबुली तरी देत आहेत, असे संरक्षणमंत्री म्हणाले. पाकिस्तान दहशतवादाच्या मार्गाने भारतास कमकुवत करू पाहत आहे. पण याला खंबीरपणे कसे उत्तर द्यायचे हे ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंह