शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उपोषण थांबवण्यासाठी पंतप्रधानांशी चर्चा करा; शेतकरी नेते डल्लेवाल यांचा भाजपला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 12:36 IST

मागण्या मान्य झाल्या, तरच उपोषण सोडणार!

चंडीगड : माझे उपोषण थांबवण्यासाठी अकाल तख्तकडे हस्तक्षेप करण्याची मागणी करण्याऐवजी भाजपने पंतप्रधाननरेंद्र मोदींची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांनी सत्ताधारी पक्षाला दिला आहे. डल्लेवाल यांचे उपोषण संपवण्यासाठी अकाल तख्तने हस्तक्षेप करण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यामुळे डल्लेवाल यांनी भाजप व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. 

डल्लेवालांच्या उपोषणाला शुक्रवारी ४६ दिवस पूर्ण झाले आहेत. भाजपच्या नेत्यांनी अकाल तख्तला विनंती करण्याऐवजी पंतप्रधान मोदी, उपराष्ट्रपती धनखड, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करावी, असा सल्ला डल्लेवाल यांनी सत्ताधारी पक्षाला दिला.  

मागण्या मान्य झाल्या, तरच उपोषण सोडणार!

जोपर्यंत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा दृढनिश्चय शेतकरी नेते डल्लेवाल यांनी केला आहे. उपोषणादरम्यान उपचार घेण्यास नकार दिल्याने डल्लेवालांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. केंद्राचा मसुदा पंजाब सरकारने फेटाळला. कृषी विपणनाबाबतचा केंद्र सरकारचा मसुदा पंजाब सरकारने फेटाळला आहे. शेतकऱ्यांनी एक वर्षापेक्षा जास्त काळ आंदोलन केल्यामुळे २०२१ मध्ये रद्द झालेले तीन वादग्रस्त कृषी कायदे परत आणण्याचा डाव केंद्र सरकारने आखला असून हा मसुदा त्याचाच एक भाग असल्याचा दावा पंजाब सरकारने केला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीStrikeसंपBJPभाजपा