शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानसोबत होऊ शकते चर्चा, भारताने दिले संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 20:02 IST

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा दहशतवादासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये ठप्प झाली आहे. मात्र पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याबाबत भारताच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे दिसत असून, दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानबरोबर चर्चा होऊ शकते, असे संकेत भारताकडून देण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय चर्चा दहशतवादासह विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये ठप्प झाली आहे. मात्र पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याबाबत भारताच्या भूमिकेमध्ये बदल झाल्याचे दिसत असून, दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानबरोबर चर्चा होऊ शकते, असे संकेत भारताकडून देण्यात आले आहेत.दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, पण दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा नक्कीच पुढे नेता येईल, असे भारताने म्हटले आहे. तसेच दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची भेट झाल्याच्या वृत्तालाही भारताकडून दुजोरा देण्यात आला आहे. भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार नसीर खान जंजुआ यांची भेट २६ डिसेंबर रोजी बँकॉक  येथे झाली होती. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्याबाबत मौन पाळले होते.  भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चेबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, "चर्चा आणि दहशतवाद एकत्रपणे चालू शकत नाहीत, असे आम्ही वारंवार सांगितले आहे. पण अशी काही माध्यमे आहेत ज्यांच्याद्वारे भारत आणि पाकिस्तानमधील चर्चा सुरू असते. बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये चर्चा होत असते. त्याचपद्धतीने दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक झाली होती. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाहीत, असे आम्ही सांगत असलो तरी दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चा निश्चितपणे पुढे जाऊ शकते." डोवाल आणि त्यांच्या पाकिस्तानी समकक्षांमध्ये झालेल्या बैठकीत झालेल्या चर्चेची संक्षिप्त माहितीसुद्ध रवीश कुमार यांनी यावेळी दिली. " या चर्चेवेळी भारताकडून सीमेपलीकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांचा प्रश्न उपस्थित केला. तसेच ही चर्चा केवळ दहशतवादाच्या मुद्द्यावरच केंद्रित राहिली. दहशतवादाच्या झळा संपूर्ण देशाला बसू नयेत हे निश्चित करण्याला आमचे प्राधान्य आहे." भारत आणि पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये होणाऱ्या बैठकीपूर्वी पाकिस्तानच्या कारागृहामध्ये कैद असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट घडवून आणण्यात आली होती. मात्र या मुलाखतीदरम्यान पाकिस्तानने  कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीला दिलेल्या वागणुकीला भारताने अपमानास्पद मानले होते. याबाबत प्रतिक्रिया देताना परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जाधव यांच्या परिवारासोबत जे काही घडले ती त्यावेळची घटना होती. मात्र द्विपक्षीय चर्चेची तारीख त्याआधीच निश्चित झाली होती.  मात्र दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांमध्ये अशा प्रकारची चर्चा कधी होईल याबाबत निश्चितपणे सांगता येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.   

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTerrorismदहशतवाद