शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

दिल्लीसाठी पर्यायी विमानतळ बांधण्याचे कंत्राट स्वीस कंपनीस ; सर्वाधिक महसूल देण्याची निविदा मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2019 06:06 IST

एकूण चार स्पर्धकांमध्ये झ्युरीच कंपनीने प्रतिप्रवासी ४०१ रुपये महसूल देण्याची भरलेली निविदा सर्वाधिक बोलीची ठरल्याने ती स्वीकारण्यात आली.

नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढता ताण कमी करण्यासाठी उत्तर प्रदेशात जेवार येथे नवे पर्यायी विमानतळ बांधून त्याचे व्यवस्थापन करण्याचे कंत्राट झ्युरीच एअरपोर्ट इंटरनॅशनल या स्वीत्झर्लंडच्या कंपनीने सर्वोच्च बोली लावून जिंकले आहे. दिल्लीपासून सुमारे ८० कि.मी. अंतरावर यमुना एक्स्प्रेस-वेलगत हे नवे विमानतळ बांधण्यात येणार असून, पूर्ण झाल्यावर ते भारतातील सर्वात मोठे विमानतळ असेल.एकूण चार स्पर्धकांमध्ये झ्युरीच कंपनीने प्रतिप्रवासी ४०१ रुपये महसूल देण्याची भरलेली निविदा सर्वाधिक बोलीची ठरल्याने ती स्वीकारण्यात आली. दिल्लीच्या सध्याच्या विमानतळाचे काम करून व्यवस्थापन करणाऱ्या ‘जीएमआर इन्फ्रा’ कंपनीने प्रतिप्रवासी ३५१ रुपयांची, अदानी एन्टरप्रायजेसने ३६० रुपयांची, तर ‘फेअरफॅक्स’ कंपनीने २०५ रुपयांची बोली दिली होती. ‘यमुना एक्स्प्रेस-वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ हे उत्तर प्रदेश सरकारचे प्राधिकरण या नव्या विमानतळाच्या विकासासाठी ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम करील.दिल्ली विमानतळाचे कंत्राट सन २००६ मध्ये ‘जीएमआर’ कंपनीस देताना केलेल्या करारात या विमानतळाच्या १५० कि.मी. परिघात नवे विमानतळ बांधायचे झाल्यास नकाराचा प्रथम अधिकार असेल, अशी तरतूद होती. त्यानुसार आता जेवार विमानतळाच्या कंत्राटात ‘जीएमआर’ कंपनीची बोली सर्वोच्च बोलीहून १० टक्क्यांनी कमी असती तरच त्यांना स्वत:ची बोली तेवढी वाढविण्याची संधी मिळाली असती; परंतु ‘जीएमआर’ व झ्युरीच कंपनीच्या बोलीमधील फरक १० टक्क्यांहून जास्त असल्याने ‘जीएमआर’ कंपनीची बोली वाढविण्याची संधी हुकली. झ्युरीच एअरपोर्ट इंटरनॅशनल या कंपनीने झ्युरीचसह जगभरातील आठ विमानतळे बांधली असून, ती त्यांचे व्यवस्थापनही करीत आहे.याआधी मंगळुरू विमानतळाचे कंत्राट ज्या कंपनीसमूहाने जिंकले होते त्यात झ्युरीच कंपनीचे १७ टक्के भाग भांडवल होते. मात्र, नंतर ती त्या कामातून बाहेर पडली. गोव्याचा चिप्पी येथील विमानतळ व नवी मुंबईतील विमानतळ बांधण्यासाठी या कंपनीने इतर कंपन्यांसह संयुक्तपणे अयशस्वी निविदा भरल्या होत्या.ब-याच वर्षांपासून सुरू होता विचारदिल्लीच्या सध्याच्या विमानतळाची क्षमता १० वर्षांत कमाल पातळीवर जाईल, हे लक्षात घेऊन या नव्या विमानतळाचा विचार बºयाच वर्षांपासून सुरू होता. राजनाथसिंग व मायावती मुख्यमंत्री असताना, असे प्रस्ताव केले गेले; पण ते फारसे पुढे गेले नव्हते.३० वर्षांची चार टप्प्यांची योजनाया नव्या जेवार विमानतळावर एकूण सात धावपट्ट्या असतील व सर्व काम पूर्ण झाल्यावर त्याची क्षमता वर्षाला सात कोटी प्रवासी हाताळण्याची असेल. सन २०२३ ते २०५० या कालावधीत एकूण चार टप्प्यांत या विमानतळाचे काम केले जाईल व त्यासाठी सुमारे २९,२६१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

टॅग्स :Airportविमानतळ