शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

राज्ये मृतांची संख्या लपवत असल्याची शंका, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 08:57 IST

दोन महिन्यांत केरळ, महाराष्ट्रात कोरोना मृत्यूंमध्ये वाढ

हरीश गुप्ता  नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीची तीव्रता कमी झाली असताना केरळ व महाराष्ट्रामध्ये मात्र मृतांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत या दोन राज्यांमध्ये मृतांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. राज्ये मृतांची संख्या लपवत असावेत, अशी तज्ज्ञांना शंका आहे.कोरोनामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यात देशामध्ये २६,३०३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी केरळमध्ये १३,८६० मृत्यू झाले. उर्वरित १२,४४३ जणांचा मृत्यू अन्य राज्यांत झाला. केरळपाठोपाठ महाराष्ट्रामध्ये डिसेंबर, जानेवारी महिन्यात १५७५ जण कोरोनामुळे मरण पावले. महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत कोरोनामृतांची एकूण संख्या एक लाख ४२ हजार ५७२ झाली.  

डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोनामुळे दिल्लीत ७३०, उत्तर प्रदेशात ३७९, गुजरातमध्ये ३४५ जण मरण पावले. ओमायक्रॉनची तीव्र लाट असतानाही देशात मृतांचे प्रमाण कमी होते. मात्र आता साथीचा जोर कमी असताना डिसेंबर व जानेवारीमध्ये देशात २६ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली. डिसेंबरमध्ये १२,०७६ जण मरण पावले, तर जानेवारीत १४,२२७ जणांनी जीव गमावला. 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेशएखादी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली असा उल्लेख मृत्यू प्रमाणपत्रात नसला तरी पुरेशी कागदपत्रे सादर करण्यात आली तर मृताच्या वारसदाराला ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. कोरोना चाचणी केल्यानंतर एक महिन्याच्या आत झालेला मृत्यू हा या संसर्गाने झालेला मृत्यू म्हणून गृहीत धरावा, असा निकष ठरविण्यात आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूSupreme Courtसर्वोच्च न्यायालय