शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

राज्ये मृतांची संख्या लपवत असल्याची शंका, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 08:57 IST

दोन महिन्यांत केरळ, महाराष्ट्रात कोरोना मृत्यूंमध्ये वाढ

हरीश गुप्ता  नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीची तीव्रता कमी झाली असताना केरळ व महाराष्ट्रामध्ये मात्र मृतांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत या दोन राज्यांमध्ये मृतांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. राज्ये मृतांची संख्या लपवत असावेत, अशी तज्ज्ञांना शंका आहे.कोरोनामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यात देशामध्ये २६,३०३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी केरळमध्ये १३,८६० मृत्यू झाले. उर्वरित १२,४४३ जणांचा मृत्यू अन्य राज्यांत झाला. केरळपाठोपाठ महाराष्ट्रामध्ये डिसेंबर, जानेवारी महिन्यात १५७५ जण कोरोनामुळे मरण पावले. महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत कोरोनामृतांची एकूण संख्या एक लाख ४२ हजार ५७२ झाली.  

डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोनामुळे दिल्लीत ७३०, उत्तर प्रदेशात ३७९, गुजरातमध्ये ३४५ जण मरण पावले. ओमायक्रॉनची तीव्र लाट असतानाही देशात मृतांचे प्रमाण कमी होते. मात्र आता साथीचा जोर कमी असताना डिसेंबर व जानेवारीमध्ये देशात २६ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली. डिसेंबरमध्ये १२,०७६ जण मरण पावले, तर जानेवारीत १४,२२७ जणांनी जीव गमावला. 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेशएखादी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली असा उल्लेख मृत्यू प्रमाणपत्रात नसला तरी पुरेशी कागदपत्रे सादर करण्यात आली तर मृताच्या वारसदाराला ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. कोरोना चाचणी केल्यानंतर एक महिन्याच्या आत झालेला मृत्यू हा या संसर्गाने झालेला मृत्यू म्हणून गृहीत धरावा, असा निकष ठरविण्यात आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूSupreme Courtसर्वोच्च न्यायालय