शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्ये मृतांची संख्या लपवत असल्याची शंका, सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 08:57 IST

दोन महिन्यांत केरळ, महाराष्ट्रात कोरोना मृत्यूंमध्ये वाढ

हरीश गुप्ता  नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीची तीव्रता कमी झाली असताना केरळ व महाराष्ट्रामध्ये मात्र मृतांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन महिन्यांत या दोन राज्यांमध्ये मृतांचे प्रमाण सर्वाधिक असून, त्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली. राज्ये मृतांची संख्या लपवत असावेत, अशी तज्ज्ञांना शंका आहे.कोरोनामुळे डिसेंबर व जानेवारी महिन्यात देशामध्ये २६,३०३ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी केरळमध्ये १३,८६० मृत्यू झाले. उर्वरित १२,४४३ जणांचा मृत्यू अन्य राज्यांत झाला. केरळपाठोपाठ महाराष्ट्रामध्ये डिसेंबर, जानेवारी महिन्यात १५७५ जण कोरोनामुळे मरण पावले. महाराष्ट्रात ३१ जानेवारीपर्यंत कोरोनामृतांची एकूण संख्या एक लाख ४२ हजार ५७२ झाली.  

डिसेंबर, जानेवारीमध्ये कोरोनामुळे दिल्लीत ७३०, उत्तर प्रदेशात ३७९, गुजरातमध्ये ३४५ जण मरण पावले. ओमायक्रॉनची तीव्र लाट असतानाही देशात मृतांचे प्रमाण कमी होते. मात्र आता साथीचा जोर कमी असताना डिसेंबर व जानेवारीमध्ये देशात २६ हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली. डिसेंबरमध्ये १२,०७६ जण मरण पावले, तर जानेवारीत १४,२२७ जणांनी जीव गमावला. 

सर्वोच्च न्यायालयाचा आदेशएखादी व्यक्ती कोरोनामुळे मरण पावली असा उल्लेख मृत्यू प्रमाणपत्रात नसला तरी पुरेशी कागदपत्रे सादर करण्यात आली तर मृताच्या वारसदाराला ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. कोरोना चाचणी केल्यानंतर एक महिन्याच्या आत झालेला मृत्यू हा या संसर्गाने झालेला मृत्यू म्हणून गृहीत धरावा, असा निकष ठरविण्यात आला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूSupreme Courtसर्वोच्च न्यायालय