शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

बारा आमदारांचे निलंबन घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ओढले ताशेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 07:11 IST

सुनावणी न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमाेर झाली.

सुरेश भुसारी नवी दिल्ली :  बारा  आमदारांवरील निलंबनाच्या कारवाईवरून सर्वाेच्च न्यायालयाने राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले आहेत. निलंबनाची कारवाई ही निष्कासनापेक्षाही भयंकर असून, यामुळे घटनात्मक मूल्यांचाही संकोच हाेत असल्याचे सांगून काेणत्याही आमदारांना ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी निलंबित करण्याचा सभागृहाचा अधिकार नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नाेंदवले. याप्रकरणी पुढील सुनावणी १८ जानेवारीला आहे. 

सुनावणी न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमाेर झाली. सुनावणीनंतर आमदारांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना सांगितले, तुम्ही घटनात्मक पाेकळी निर्माण करू शकत नाही. प्रत्येक मतदारसंघाला समान प्रतिनिधित्व असते. 

लाेकशाही मूल्यांना धाेका

निलंबन ही त्या आमदारालाच नव्हे, तर त्या मतदारसंघालाही दिलेली शिक्षा आहे. आज १२ आहेत. उद्या १२० असतील. लाेकशाहीमध्ये हा चुकीचा पायंडा पडू शकताे आणि त्यामुळे लाेकशाही मूल्यांसाेबत तडजाेड हाेण्याचा माेठा धाेका आहे, असे न्यायालयाने म्हटले.

...तर ती जागा रिक्त घाेषित करावी

काेणताही सदस्य परवानगीशिवाय ५९ दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी अनुपस्थित असेल, तर ती जागा रिक्त म्हणून घाेषित करावी, असा घटनेच्या कलम १९० (४) मध्ये स्पष्ट उल्लेख असल्याचे निरीक्षण कोर्टाने नाेंदविले.

‘सत्य जनतेसमोर येईल’ 

१२ आमदार निलंबनप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंकडून वाद-प्रतिवाद करण्यात आले. आमचा सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयातच या विषयात न्याय होईल आणि सत्य जनतेसमोर येईल. - आशिष शेलार 

आमदारांचे निलंबन केल्यामुळे संबंधित मतदारसंघाचे प्रश्न मांडले जात नाहीत. सभागृहाला ६० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी सदस्याला निलंबित करण्याचा अधिकार नाही. नियमानुसार काेणताही मतदारसंघ ६ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रतिनिधीत्वाशिवाय राहू शकत नाही. या प्रकरणापुरते बाेलायचे झाल्यास आता पुरे झाले. 

आम्हाला अधिक तपशील देण्याची गरज नाही, अशा शब्दांमध्ये न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले. विधिमंडळाने दिलेल्या शिक्षेचा कालावधी हे न्यायालय ठरवू शकत नाही, हा महाराष्ट्र सरकारचे वकील सी. आर्यम सुंदरम यांचा युक्तिवाद सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळून लावला. 

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाShiv Senaशिवसेना