शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हिंदू मुलींच्या अपहरणावरुन सुषमा स्वराज आणि पाकमंत्र्यामध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 15:53 IST

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालंय. सुषमा स्वराज यांनी या घटनेचा हवाला देत पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना या घटनेबाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून होळीच्या पूर्वसंध्येला दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आले. या मुलींना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव आणण्यात आल्याची बातमी आहे. यावरुन भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालंय. सुषमा स्वराज यांनी या घटनेचा हवाला देत पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना या घटनेबाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सुषमा स्वराज यांच्या ट्विटवर उत्तर देताना पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी हे म्हणाले की, ही घटना पाकिस्तानमधील अंतर्गत विषय आहे आणि येथील लोकांना विश्वास आहे की, हा मोदींचा भारत नाही ज्याठिकाणी अल्पसंख्याकांवर दबाव आणला जातो. हा इमरान खान यांचा नवीन पाकिस्तान आहे. आमच्या झेंड्याचा पांढरा रंग आम्ही सर्वांशी समान न्यायाने वागतो हे दर्शवतो. मला खात्री आहे की, ज्यावेळी भारतीय अल्पसंख्याकांच्या अधिकारावर गदा येईल तेव्हा तुम्ही याच तत्परतेने कारवाई कराल असं म्हटलं.

तर फवाद चौधरी यांच्या ट्विटला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, आपल्या भितीमागे हा पर्याय असू शकतो, मात्र आपल्या बोलण्यातून हे दिसतं की आपण गुन्हेगारीच्या भावनेतून बोलत आहात. 

ही घटना पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यामध्ये घडली आहे. होळी सणाच्या एक दिवस आधी काही अज्ञात लोकांनी दोन हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण केले. अपहरण केल्यानंतर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये या दोन्ही मुलींचा जबरदस्तीने एक मौलाना निकाह लावून देताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये या अल्पवयीन मुलींनी स्वखुशीने इस्लाम धर्म कबूल केल्याचं सांगण्यात आलंय. माहितीनुसार पाकिस्तानमधील हिंदू समुदायाने या घटनेच्या विरोध करत निर्दशने केली आहेत. संबंधित दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTwitterट्विटरHinduहिंदूKidnappingअपहरण