शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू मुलींच्या अपहरणावरुन सुषमा स्वराज आणि पाकमंत्र्यामध्ये ट्विटरवर शाब्दिक युद्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 15:53 IST

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालंय. सुषमा स्वराज यांनी या घटनेचा हवाला देत पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना या घटनेबाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या सिंध प्रांतातून होळीच्या पूर्वसंध्येला दोन अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करण्यात आले. या मुलींना जबरदस्तीने मुस्लिम धर्म स्विकारण्यासाठी दबाव आणण्यात आल्याची बातमी आहे. यावरुन भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झालंय. सुषमा स्वराज यांनी या घटनेचा हवाला देत पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना या घटनेबाबत अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सुषमा स्वराज यांच्या ट्विटवर उत्तर देताना पाकिस्तानचे प्रसारण मंत्री फवाद चौधरी हे म्हणाले की, ही घटना पाकिस्तानमधील अंतर्गत विषय आहे आणि येथील लोकांना विश्वास आहे की, हा मोदींचा भारत नाही ज्याठिकाणी अल्पसंख्याकांवर दबाव आणला जातो. हा इमरान खान यांचा नवीन पाकिस्तान आहे. आमच्या झेंड्याचा पांढरा रंग आम्ही सर्वांशी समान न्यायाने वागतो हे दर्शवतो. मला खात्री आहे की, ज्यावेळी भारतीय अल्पसंख्याकांच्या अधिकारावर गदा येईल तेव्हा तुम्ही याच तत्परतेने कारवाई कराल असं म्हटलं.

तर फवाद चौधरी यांच्या ट्विटला उत्तर देताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या की, आपल्या भितीमागे हा पर्याय असू शकतो, मात्र आपल्या बोलण्यातून हे दिसतं की आपण गुन्हेगारीच्या भावनेतून बोलत आहात. 

ही घटना पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील घोटकी जिल्ह्यामध्ये घडली आहे. होळी सणाच्या एक दिवस आधी काही अज्ञात लोकांनी दोन हिंदू अल्पवयीन मुलींचे अपहरण केले. अपहरण केल्यानंतर या घटनेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये या दोन्ही मुलींचा जबरदस्तीने एक मौलाना निकाह लावून देताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये या अल्पवयीन मुलींनी स्वखुशीने इस्लाम धर्म कबूल केल्याचं सांगण्यात आलंय. माहितीनुसार पाकिस्तानमधील हिंदू समुदायाने या घटनेच्या विरोध करत निर्दशने केली आहेत. संबंधित दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानTwitterट्विटरHinduहिंदूKidnappingअपहरण