शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दोन दिवसांपूर्वीच अमित शाहंनी नितीश कुमारांना केला होता फोन, काय झाली होती चर्चा? सुशील मोदींनी सांगितल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 20:24 IST

पंतप्रधान मोदींनीही गेल्या दीड वर्षांत अनेक वेळा नीतिश कुमारांना फोन केला होता, पण...

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली आणि राजदसोबत सरकार स्थापन केले. यानंतर आता,  नितीश कुमार यांनी 17 वर्षांचे नाते तोडून विश्वासघात केल्याचा आरोप भाजप खासदार सुशील मोदी यांनी केला आहे. एवढेच नाही, तर गेल्या दोन दिवसांपूर्वीच अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. तेव्हा नितीश यांनी अमित शहा यांना काळजी करण्याची गरज नाही, असे म्हटले होते, असा दावाही सुशील मोदी यांनी केला आहे.

माध्यमांसोबत बोलताना सुशील कुमार मोदी म्हणाले, "दोन दिवसांपूर्वी, अमित शाह यांनी नितीश कुमारांना फोन केला होता. तेव्हा नितीश म्हणाले होते, की चिंता करण्याचे कारण  नाही. पंतप्रधान मोदींनीही गेल्या दीड वर्षांत अनेक वेळा नीतिश कुमारांना फोन केला होता. मात्र, त्यांनी कधीही तक्रार केली नाही," असेही सुशीलकुमार म्हणाले.

तत्पूर्वी, नितीश कुमार यांनी, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले, भाजपाला वाटले होते की, विरोधी पक्ष संपुष्टात येईल. मात्र आता आम्हीही विरोधी पक्षामध्ये आहोत. त्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, २०१४ मध्ये येणारे २०२४ मध्ये राहतील तेव्हा ना. आम्ही राहू अथवा न राहू. पण २०२४ मध्ये ते राहणार नाहीत. मी विरोधी पक्षांना २०२४ मध्ये एकजूट होण्याचं आवाहन करतो. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहNitish Kumarनितीश कुमारBiharबिहारBJPभाजपा