शहरं
Join us  
Trending Stories
1
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
2
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
3
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
4
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
5
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
6
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
7
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
8
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
9
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
10
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
11
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
12
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
13
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
14
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
15
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
16
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
17
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
18
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
19
Bigg Boss 19 Finale: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
20
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
Daily Top 2Weekly Top 5

येडियुरप्पांपुढे सुप्रीम प्रश्नचिन्ह कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:33 IST

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस व जेडीएसने बुधवारी मध्यरात्री तातडीने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पहाटेपर्यंत घणाघाती सुनावणीही झाली.

नवी दिल्ली : कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांच्या निर्णयाविरुद्ध काँग्रेस व जेडीएसने बुधवारी मध्यरात्री तातडीने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पहाटेपर्यंत घणाघाती सुनावणीही झाली. परंतु येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्यास किंवा बहुमत सिद्ध करण्यासाठीची १५ दिवसांची मुदत कमी करण्याचा आदेश लगेच देण्यास न्यायालयाने नकार दिला. मात्र होणारा शपथविधी आमच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून असेल, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने कर्नाटकमधील भाजपाचे सरकार वैधतेचे प्रश्नचिन्ह घेऊनच स्थापन झाले. या सरकारचे भवितव्य काय हे शुक्रवारच्या सुनावणीत स्पष्ट होईल.काँग्रेसनर्फे युक्तिवाद करताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी उपस्थित केलेल्या दोन प्रमुख मुद्द्यांचा परामर्श घेण्यासाठी, येडियुरप्पा यांनी सरकार स्थापनेचा दावा करणारे राज्यपालांना दिलेले पत्र व राज्यपालांनी त्यांना दिलेले सरकार स्थापनेच्या निमंत्रणाचे पत्र ही दोन्ही पत्रे न्यायालयाने शुक्रवारी सादर करण्यास सांगितले. बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवस देणे योग्य की अयोग्य यावर दोन दिवसांनीही खल केला जाऊ शकतो. येडियुरप्पा यांच्या वतीने कोणीही वकील हजर नव्हता.आणखी एक याचिकाकर्नाटक विधानसभेत अँग्लो इंडियन सदस्य राज्यपालांकडून नेमला जातो. तो नेमण्याच्या हालचालीही सुरूआहेत हे कळल्यावर त्यास मनाई करण्यासाठी दुसरी याचिका गुरुवारी दाखल केली गेली. त्यावरही मुख्य याचिकेसोबत सुनावणी होईल.>मध्यरात्री धावाधावयेडियुरप्पा यांना राज्यपाल पाचारण करणार याची कुणकुण असल्याने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी. परमेश्वरन व जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांच्या नावाने याचिका तयारच होती. राज्यपालांनी येडियुरप्पा यांनी निमंत्रण दिल्याचे जाहीर होताच वकिलांची फौज कामाला लागली. रात्री ११ च्या सुमारास ही मंडळी न्यायालयाच्या रजिस्ट्रारच्या घरी पोहोचली. त्यानंतर सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांना झोपेतून उठवून याचिकेचे काय करायचे यावर प्रशासकीय खल झाला. याचिकेची तातडीने दखल घेण्याची गरज आहे, असा सरन्यायाधीशांचा निर्णय मध्यरात्रीनंतर १.१५ वाजता झाला. संबंधित कर्मचाऱ्यांना बोलावून न्यायालय भरविण्याची तयारी झाल्यावर पहाटे दोन वाजता याचिकेवर सुनावणी सुरू झाली. याआधी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी याकूब मेमन याची फाशी रोखण्यासाठी केलेल्या याचिकेवर मध्यरात्रीनंतर सुनावणी झाली होती. अपरात्री कोण न्यायाधीश उपलब्ध होऊ शकतात याची चाचपणी करून न्या. ए. के. सिक्री, न्या. शरद बोबडे व न्या. अशोक भूषण यांचे विशेष खंडपीठ तातडीने स्थापन केले गेले.>अभिषेक मनू सिंघवी यांनी उपस्थित केलेले दोन मुद्देयेडियुरप्पा यांनी पत्रात बहुमत सिद्ध करण्यासाठी ७ दिवसांची वेळ मागूनही राज्यपालांनी १५ दिवसांची मुदत दिली. राज्यपालांचा निर्णय पक्षपाती आहे.राज्यघटनेने राज्यपालांना स्वेच्छाधिकार दिलेला आहे हे खरे. परंतु ज्याला निमंत्रित करत आहोत, त्याच्याकडे सकृतदर्शनी बहुमत आहे व तो स्थिर सरकार स्थापन करू शकेल याविषयी त्यांनी खात्री करून घेणे ही तो अधिकार वापरण्याची पूर्वअट आहे. काँग्रेस-जेडीएसने सरकार स्थापनेच्या दाव्यासोबत ११७ आमदारांच्या स्वाक्षºयांच्या पत्राच्या रूपाने स्पष्ट बहुमताचा पुरावा दिला असताना येडियुरप्पा यांना बोलावण्याचा निर्णय राज्यपालांनी कशाच्या आधारे घेतला?>कोर्टात घडले राजकीय नाट्यफोडाफोडीसाठी त्यांना१५ दिवस दिले का?येडियुरप्पांंच्या पाठीशी बहुमत नाही, हे दिसत असूनही त्यांना फोडाफोडी करून बहुमत सिद्ध करता यावे यासाठी राज्यपालांनी न मागता १५ दिवसांचा अवधी दिला, हे स्पष्ट होते, असे सिंघवी यांचे म्हणणे होते.राज्यपालांची बाजू : हे तर विरोधकांचे अंधारात तीरकेंद्र सरकार व राज्यपालांच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सिंघवी यांच्या युक्तिवादाचा प्रतिवाद केला. ते म्हणाले की, येडियुरप्पा यांनी राज्यपालांना दिलेले पत्र समोर नसताना अंधारात तीर मारणे सुरू आहे!न्यायालय म्हणाले...: तुम्ही ते पत्र सादर करा म्हणजे अंधार दूर होऊन सर्व काही स्पष्ट होईल.भाजपाची बाजू : सुनावणीची एवढी घाई कशाला?भाजपाच्या वतीने ज्येष्ठ वकील मुकुल रोहटगी यांनी अपरात्री या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यासच आक्षेप घेतला. निवडणुकीनंतर सरकार स्थापन करणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे. त्यामुळे राज्यपालांना त्यांचे घटनात्मक कर्तव्य करण्यापासून रोखा अशी याचिकाच केली जाऊ शकत नाही. शिवाय तातडीने सुनावणी न घेण्याने काही आभाळ कोसळणार नाही.>आमदारांनीधरले धरणेयेडियुरप्पांच्या शपथविधीच्या विरोधात आज बंगळुरूमध्ये विधान भवनाबाहेर काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी धरणे धरले़ अपक्ष व बसपा यांचा प्रत्येकी एक आमदारही काँग्रेस-जनता दल आघाडीसोबत आहे. तेही या वेळी हजर होते.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८