शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'चौकीदार चोर है' टीकेवरुन राहुल गांधी अडचणीत, सुप्रीम कोर्टाने बजावली अवमान नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 13:47 IST

राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खंत व्यक्त केली मात्र माफी मागितली नाही. या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - चौकीदार चोर है या विधानावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. राफेल प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी आता कोर्टानेही म्हटलं चौकीदार चोर है असं विधान केलं होतं. याविरोधात भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींचे विधान हे कोर्टाचा अवमान असल्याने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुप्रीम कोर्टात राहुल गांधी यांनी आपण केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही त्यामुळे मीनाक्षी लेखी यांनी आक्षेप घेतला.  मंगळवारी याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी मीनाक्षी लेखी यांच्याकडून मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खंत व्यक्त केली मात्र माफी मागितली नाही. या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे. 

राफेल प्रकरणात सुनावणीच्या दरम्यान भ्रष्टाचाराबाबत राफेलची लीक झालेली कागदपत्रे ग्राह्य धरली जातील असं सुप्रीम कोर्टाने सांगितले होतं. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना आता कोर्टानेही मानलं आहे की, चौकीदार चोर हे अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. त्यांच्या या विधानावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला होता. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात याबाबत अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टानेही राहुल गांधी यांच्या विधानावरुन अवमान नोटीस पाठवली होती. त्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र नुसतं दिलगिरी व्यक्त करण्यावर भाजपाचं समाधान झालं नाही. राहुल गांधी यांनी दिलेल्या उत्तरामध्ये वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात सांगितले की, राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही. त्यावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, आतापर्यंत राहुल गांधी यांनी दिलेलं उत्तर वाचलं नाही. मुकुल रोहतगी यांना राहुल गांधींनी दिलेलं उत्तर कोर्टात वाचून दाखवावं असं सरन्यायाधीशांनी सांगितले. 

हे उत्तर वाचून दाखवताना मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. राहुल गांधी आपली चूक झाल्याचं कबुल केलं मात्र या उत्तरात कुठेही माफी मागितली नाही. या दरम्यान सरन्यायाधीशांनी चौकीदार कोण आहे? असा प्रश्न मुकुल रोहतगी यांना केला. त्यावेळी रोहतगी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी पूर्ण देशाला सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार चोर है, मात्र यावर सुप्रीम कोर्टाने कुठलीही टिप्पणी केली नाही. या प्रकरणावर सुनावणी पुढील 30 एप्रिल रोजी पुन्हा करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRafale Dealराफेल डीलSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी