शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
4
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
5
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
6
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
7
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
8
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
9
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
10
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
11
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
12
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
13
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
14
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
15
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
16
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
17
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
18
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
19
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
20
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...

'चौकीदार चोर है' टीकेवरुन राहुल गांधी अडचणीत, सुप्रीम कोर्टाने बजावली अवमान नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 13:47 IST

राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खंत व्यक्त केली मात्र माफी मागितली नाही. या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - चौकीदार चोर है या विधानावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहे. राफेल प्रकरणावरुन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी आता कोर्टानेही म्हटलं चौकीदार चोर है असं विधान केलं होतं. याविरोधात भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल गांधींचे विधान हे कोर्टाचा अवमान असल्याने त्यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुप्रीम कोर्टात राहुल गांधी यांनी आपण केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही त्यामुळे मीनाक्षी लेखी यांनी आक्षेप घेतला.  मंगळवारी याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीवेळी मीनाक्षी लेखी यांच्याकडून मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले की, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा त्यांनी खंत व्यक्त केली मात्र माफी मागितली नाही. या आक्षेपानंतर सुप्रीम कोर्टाकडून राहुल गांधी यांना अवमान नोटीस बजावण्यात आली आहे. 

राफेल प्रकरणात सुनावणीच्या दरम्यान भ्रष्टाचाराबाबत राफेलची लीक झालेली कागदपत्रे ग्राह्य धरली जातील असं सुप्रीम कोर्टाने सांगितले होतं. त्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना आता कोर्टानेही मानलं आहे की, चौकीदार चोर हे अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती. त्यांच्या या विधानावर भाजपाकडून आक्षेप घेण्यात आला होता. भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी सुप्रीम कोर्टात याबाबत अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर सुप्रीम कोर्टानेही राहुल गांधी यांच्या विधानावरुन अवमान नोटीस पाठवली होती. त्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र नुसतं दिलगिरी व्यक्त करण्यावर भाजपाचं समाधान झालं नाही. राहुल गांधी यांनी दिलेल्या उत्तरामध्ये वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टात सांगितले की, राहुल गांधी यांनी माफी मागितली नाही. त्यावर सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, आतापर्यंत राहुल गांधी यांनी दिलेलं उत्तर वाचलं नाही. मुकुल रोहतगी यांना राहुल गांधींनी दिलेलं उत्तर कोर्टात वाचून दाखवावं असं सरन्यायाधीशांनी सांगितले. 

हे उत्तर वाचून दाखवताना मुकुल रोहतगी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावर त्यांनी खंत व्यक्त केली आहे. राहुल गांधी आपली चूक झाल्याचं कबुल केलं मात्र या उत्तरात कुठेही माफी मागितली नाही. या दरम्यान सरन्यायाधीशांनी चौकीदार कोण आहे? असा प्रश्न मुकुल रोहतगी यांना केला. त्यावेळी रोहतगी यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी पूर्ण देशाला सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी चौकीदार चोर है, मात्र यावर सुप्रीम कोर्टाने कुठलीही टिप्पणी केली नाही. या प्रकरणावर सुनावणी पुढील 30 एप्रिल रोजी पुन्हा करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRafale Dealराफेल डीलSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी