शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

CoronaVirus News: प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागविले केंद्राचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 07:08 IST

अहमदाबादच्या गीतार्थ गंगा ट्रस्टने केली याचिका

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे देशभरात सध्या बंद असलेली सर्व प्रार्थनास्थळे पुन्हा खुली करावीत, अशी विनंती करणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे मत मागविले आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने यासंदर्भात केंद्रीय गृहखात्याला एक नोटीस जारी केली आहे. ही याचिका अहमदाबाद येथील गीतार्थ गंगा ट्रस्ट या संस्थेने दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठात न्या. ए. एस. बोपण्णा, न्या. व्ही. रामसुब्रमणियम यांचाही समावेश आहे. या याचिकेची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

गीतार्थ गंगा ट्रस्टने ज्येष्ठ विधिज्ञ सुरजेंद्रू शंकर दास यांच्यामार्फत ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली. त्यात म्हटले आहे की, प्रार्थनास्थळे किंवा तीर्थस्थळे भाविकांसाठी खुली ठेवण्याचा अधिकार राज्यघटनेच्या कलम १४, कलम १९ (१) (अ), कलम २५, २६,२१ याद्वारे भारतीय नागरिकांस मिळाला आहे. राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकाराची ही गळचेपी आहे. कोरोनामुळे मार्चमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच प्रार्थनास्थळेही बंद ठेवण्यात आली. भाविकांची गर्दी झाल्यास त्यामुळे कोरोनाचा आणखी मोठ्या प्रमाणावर फैलाव होईल, अशी भीती असल्यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता.

आता आदेशाकडे लक्षदेशात अनलॉक प्रक्रियेचे काही टप्पे पार पडूनही प्रार्थनास्थळे पुन्हा जनतेसाठी खुली करण्याबाबत केंद्र सरकार काहीच ठोस निर्णय घेत नाही, हे पाहून अनेक जण अस्वस्थ झाले आहेत. ही प्रार्थनास्थळे सुरू करण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आले. त्यामुळे आता याच विषयावरील याचिकेवर केंद्राने लवकरच मत कळविल्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय आदेश देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतTempleमंदिरCentral Governmentकेंद्र सरकार