शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मागविले केंद्राचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 07:08 IST

अहमदाबादच्या गीतार्थ गंगा ट्रस्टने केली याचिका

नवी दिल्ली : कोरोना साथीमुळे देशभरात सध्या बंद असलेली सर्व प्रार्थनास्थळे पुन्हा खुली करावीत, अशी विनंती करणाऱ्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे मत मागविले आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने यासंदर्भात केंद्रीय गृहखात्याला एक नोटीस जारी केली आहे. ही याचिका अहमदाबाद येथील गीतार्थ गंगा ट्रस्ट या संस्थेने दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठात न्या. ए. एस. बोपण्णा, न्या. व्ही. रामसुब्रमणियम यांचाही समावेश आहे. या याचिकेची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली.

गीतार्थ गंगा ट्रस्टने ज्येष्ठ विधिज्ञ सुरजेंद्रू शंकर दास यांच्यामार्फत ही याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली. त्यात म्हटले आहे की, प्रार्थनास्थळे किंवा तीर्थस्थळे भाविकांसाठी खुली ठेवण्याचा अधिकार राज्यघटनेच्या कलम १४, कलम १९ (१) (अ), कलम २५, २६,२१ याद्वारे भारतीय नागरिकांस मिळाला आहे. राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या अधिकाराची ही गळचेपी आहे. कोरोनामुळे मार्चमध्ये लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान कोणतेही धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच प्रार्थनास्थळेही बंद ठेवण्यात आली. भाविकांची गर्दी झाल्यास त्यामुळे कोरोनाचा आणखी मोठ्या प्रमाणावर फैलाव होईल, अशी भीती असल्यामुळेच केंद्र सरकारने हा निर्णय घेतला होता.

आता आदेशाकडे लक्षदेशात अनलॉक प्रक्रियेचे काही टप्पे पार पडूनही प्रार्थनास्थळे पुन्हा जनतेसाठी खुली करण्याबाबत केंद्र सरकार काहीच ठोस निर्णय घेत नाही, हे पाहून अनेक जण अस्वस्थ झाले आहेत. ही प्रार्थनास्थळे सुरू करण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी महाराष्ट्रासह इतर काही ठिकाणी आंदोलनही करण्यात आले. त्यामुळे आता याच विषयावरील याचिकेवर केंद्राने लवकरच मत कळविल्यानंतर सर्वोच्च न्यायालय काय आदेश देते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतTempleमंदिरCentral Governmentकेंद्र सरकार